• Download App
    कन्नड, जगदंबा, दौंड, पुष्पदंतेश्वर, जरंडेश्वर कारखाने शरद पवारांनी बळकावलेत; पुराव्यानिशी सिध्द करू; माणिकराव जाधवांचे ओपन डिबेटचे आव्हान Manikrao jadhav open challenge to sharad pawar for debate on suger factories scam

    कन्नड, जगदंबा, दौंड, पुष्पदंतेश्वर, जरंडेश्वर कारखाने शरद पवारांनी बळकावलेत; पुराव्यानिशी सिध्द करू; माणिकराव जाधवांचे ओपन डिबेटचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – महाराष्ट्रातले कन्नड, जगदंबा, दौंड, पुष्पदंतेश्वर, जरंडेश्वर हे कारखाने शरद पवारांनी बेकायदेशीरित्या बळकावले आहेत. त्यांचे पुरावे आम्ही कोर्टासमोर सादर केलेत. शरद पवारांनी पुढे येऊन सांगावे की या कारखान्यांशी आणि बारामती ऍग्रोशी आपला संबंध नाही, असे आव्हान माजी आमदार आणि शिखर बँक घोटाळा प्रकरणातले याचिकाकर्ते माणिकराव जाधव यांनी दिले आहे. Manikrao jadhav open challenge to sharad pawar for debate on suger factories scam

    बारामती ऍग्रो कंपनी ही पवार कुटुंबीयांची खासगी कंपनी आहे. पवार कुटुंबीय त्याचे शेअर होल्डर आहेत. त्यांनी त्याचे हेडक्वार्टर सिंगापूरला ठेवले आहे. त्यांनी १० वर्षापूर्वी कन्नड सहकारी साखर कारखाना कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता शरद पवारांनी बळकावला. आता त्यांना वाटत असेल, तर त्यांनी पुढे येऊन सांगावे, की आपला बारामती ऍग्रोशी संबंध नाही म्हणून. आमच्याकडे पुरावे आहेत. ते कोर्टासमोर ठेवले आहेत, असे माणिकराव जाधव यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

    शिखर बँकेचे भागभांडवल २५ हजार कोटींचे होते. तरीही ती बँक बुडाली कारण पवारांच्या बगलबच्च्यांनी तिचे कर्ज खाल्ले. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने कवडीमोल भावाने खासगी करून टाकले. ईडीने आता कारवाई सुरू केली आहे. ती अशीच सुरू ठेवावी. मी, अण्णा हजारे, शालिनीताई पाटील यांनी मिळून याचिका दाखल केली आहे. आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागे करण्याचे मोहीम आम्ही सुरू करणार आहोत, असे माणिकराव जाधव म्हणाले.

    ईडीचे अभिनंदन केले पाहिजे. कारण त्यांनी आर्थिक घोटाळ्याचा तपास करून मालमत्ता ताब्यात घेतली. आता ५५ कारखान्यांची मालमत्ता ताब्यात घ्यावी. त्यांचीची सखोल चौकशी ईडीने करावी. कारण महाराष्ट्राच्या आर्थिक गुन्हे शाखेने शरद पवारांना त्यांच्या विरोधात पुरावे नाहीत म्हणून क्लिन चिट दिली आहे. पण ईडीने जारीने तपास सुरू ठेवला आहे. तो तसाच सुरू ठेवून असेच घोटाळे करून विकलेले ५५ कारखाने ताब्यात घ्यावेत. शिखर बँकेच्या ताब्यातले ४५ कारखाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी माणिकराव जाधव यांनी केली आहे.

    Manikrao jadhav open challenge to sharad pawar for debate on suger factories scam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    G7 च्या निमंत्रणावरून भारतात उगाच आरडाओरडा; कॅनडाचे भारताला निमंत्रण, पंतप्रधान मोदींचा होणार दौरा!!

    Mohan Bhagwat : दबावाने धर्मांतर म्हणजे हिंसा, स्वेच्छेने केल्यास हरकत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

    Satish Shukla : पुरोहित संघाचा वाद न्यायालयापर्यंत खेचण्याची खुमखुमी; अविश्वास ठराव मंजूर होऊनही सोडवेना खुर्ची!!