five Trinamool members Resigns : गोव्यात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुढील महिन्यात होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या एआयटीसी गोवाच्या पाच प्राथमिक सदस्यांनी शुक्रवारी राजीनामे दिले आहेत. त्याचवेळी गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा अवघ्या ३ महिन्यांतच टीएमसीकडून भ्रमनिरास झाला. Mamata Banerjees dream of party expansion in Goa Gets Shocked as five Trinamool members Resigns From Party; Accused of dividing the people
वृत्तसंस्था
पणजी : गोव्यात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुढील महिन्यात होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या एआयटीसी गोवाच्या पाच प्राथमिक सदस्यांनी शुक्रवारी राजीनामे दिले आहेत. त्याचवेळी गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा अवघ्या ३ महिन्यांतच टीएमसीकडून भ्रमनिरास झाला.
यादरम्यान, सर्व सदस्यांनी आपले राजीनामे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. दरम्यान, राजीनाम्याचे कारणही नेत्यांनी उघड केले आहे. त्यांच्या राजीनामा पत्रात गोव्यातील लोकांमध्ये फूट पाडण्याचा पक्षाचा हेतू असल्याचे म्हटले आहे आणि त्यामुळेच पाच प्राथमिक सदस्यांनी तृणमूल काँग्रेसला राम राम केला आहे.
वास्तविक गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार हे सप्टेंबरमध्येच टीएमसीमध्ये सामील झाले होते. बंगाल विधानसभा निवडणुकीतील ममता बॅनर्जींच्या कामगिरीने आपण खूप प्रभावित झालो असल्याचे त्यावेळी ते म्हणाले. पक्षात आल्यानंतर तेथील संस्कृती अनुभवल्यावर भाजपचे माजी आमदार लवू मामलतदारांनी पक्षावर जातीयवादी असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यात मतांसाठी हिंदू आणि ख्रिश्चनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत, सप्टेंबरमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील काही स्थानिक नेत्यांसह पक्षात प्रवेश केल्यानंतर केवळ तीनच महिन्यांनी त्यांचा राजीनामा आला आहे.
Mamata Banerjees dream of party expansion in Goa Gets Shocked as five Trinamool members Resigns From Party; Accused of dividing the people
महत्त्वाच्या बातम्या
- Harak Singh Rawat : कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत यांनी राजीनामा घेतला मागे, भाजप पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर बदलला निर्णय
- मुंबई : न्हावाशेवा बंदरातून जप्त केले तब्बल १५ हजार किलो रक्तचंदन ; रक्तचंदनाची किंमत १५ कोटी रुपये
- मोदींच्या ख्रिसमस शुभेच्छा देखील रामचंद्र गुहांना टोचल्या; म्हणाले, ही तर दुर्गुणांनी सद्गुणांना वाहिलेली श्रद्धांजली!!
- IT RAID UTTAR PRADESH : २४ तास-१३ मशिन-३० कर्मचारी.. अन् अत्तराचा फाया नव्हे नोटा नेण्यासाठी मागवले चक्क कंटेनर ….अबब हे फोटो पहाच…!
- विलीनीकरण शक्य नाही हे माहीत होत ,तर जाहीरनाम्यात उल्लेख का केला ? ; गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर टीका