नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वर्धापन दिनीच गळती; जयंत पाटील देखील प्रदेशाध्यक्ष पदापासून दूर पळती!!, अशी अवकाळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 26 व्या वर्धापनदिनी प्राप्त झाली. पक्षाच्या गळतीच्या आणि जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा छायेखालीच राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात बंदिस्त वातावरणात वर्धापन दिन साजरा करावा लागला.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि पक्ष अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाषणे तर जोरदार केली. संघर्षाची देखील भाषा केली. पण पक्षाचे कार्यकर्ते सत्तेच्या वळचणीला जाण्याच्या ज्या भावनेने बालगंधर्व रंगमंदिरात जमले होते, त्या भावनांची दखल मात्र दोन्ही नेत्यांनी उघडपणे तरी घेतली नाही. त्यांनी राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत कुठलेही वक्तव्य केले नाही. त्आउलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 व्या वर्धापन दिनाला गळतीचेच गालबोट लागले.
- CM Fadnavis : कोणताही निधी बेकायदेशीर वळवलेला नाही, लाडकी बहीणवरून मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
पश्चिम महाराष्ट्रात घडते
सातारा जिल्ह्यातल्या पाटणचे नेते आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज रामराम ठोकला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, सांगली जिल्ह्यातल्या विटा मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील यांनी देखील तुतारी सोडून देऊन हातात कमळ घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव असल्याचा दावा करणाऱ्या शरद पवारांना त्यांचे जुने निष्ठावंत सोडून गेले. शिवाय त्यांनी सोडून जाण्याचा मुहूर्त देखील वर्धापन दिनाचा धरला. याचे पडसाद पश्चिम महाराष्ट्र उमटले.
त्याचवेळी वर्धापन दिन कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या आधी बोलताना जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदी सोडून देण्याची घोषणा करून टाकली. आता बस्स झाले. सात वर्षे एकाच पदावर राहिलो शरद पवारांनी संधी दिली आता नव्या कार्यकर्त्याला संधी द्या आणि मला पदमुक्त करा, असे जयंत पाटील म्हणाले. पण पदमुक्त झाल्यानंतर आपण नेमके कुठे जाणार आणि काय करणार??, याचा खुलासा जयंत पाटलांनी केला नाही.
– जयंत पाटलांची कोंडी की खुंटा हलवून बळकट??
त्या उलट जयंत पाटलांनी फक्त मनातल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी अजून कुठले पत्र राष्ट्रवादी काँग्रेसला दिले नाही किंवा प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामाही दिलेला नाही त्यामुळे नवा प्रदेशाध्यक्ष निवडायचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला. या खुलाशातून त्यांनी जयंत पाटलांनी विरोधातल्या भावनांना चाप लावला की पुढचा निर्णय घेऊ इच्छिणाऱ्या जयंत पाटलांचीच कोंडी केली??, असा सवाल कार्यकर्त्यांच्या मनात आला. कारण आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालचा तरुण आमदारांचा गट जयंत पाटलांच्या विरोधात काम करतो हे अनेकदा जाहीरपणे दिसले होते. जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची उघड इच्छा व्यक्त करून आपला खुंटा हलवून बळकट केला की खरंच आपल्याला स्वतंत्र निर्णय घेऊ द्या, अशी अप्रत्यक्ष विनंती शरद पवारांना केली??, याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली.
Jayant Patil wants to quit NCP SP state presidentship
महत्वाच्या बातम्या
- Wajahat Khan : शर्मिष्ठा पनोली प्रकरणातील फिर्यादीच निघाला हिंदूविरोधी, तक्रार दाखल करणाऱ्या वजाहत खानला हिंदू धर्माविरोधात आक्षेपार्ह पोस्ट
- Mohd Yunus ढाक्यामध्ये लोकशाही वाद्यांच्या निदर्शनांवर बंदी घालून नोबेल पुरस्कार विजेता राज्यकर्ता harmony award घेण्यासाठी गेला लंडनला!!
- आता RCBने चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात घेतली धाव
- Sarsanghchalak : सरसंघचालकांची स्वयंसेवकांशी पंच परिवर्तनावर चर्चा, संघाचे साहित्य प्रत्येक घरात पोहोचवण्यावर भर