• Download App
    दहशतवादाच्या वेगवेगळ्या व्याख्या नकोत, भारताचा संयुक्त राष्ट्रांमध्ये इशारा India warns world on terrorisam

    दहशतवादाच्या वेगवेगळ्या व्याख्या नकोत, भारताचा संयुक्त राष्ट्रांमध्ये इशारा

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क – अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा दहशतवादाची, हिंसक राष्ट्रवाद, उजव्या विचारसरणीचा कट्टरतावाद अशा विविध प्रकारे व्याख्या करण्याचा प्रयत्न होत असल्याचा इशारा भारताने जगाला दिला. ‘तुमचे दहशतवादी आणि आमचे दहशतवादी’ असे समजण्याच्या काळाकडे आपण पुन्हा जाणे योग्य नाही, दहशतवाद्यांचा एकत्रितपणे सामना करायला हवा, असे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये केले. India warns world on terrorisam

    संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी भारताची भूमिका मांडली. ‘‘दहशतवादाचा सर्व जगाला धोका असल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्य केले आहे. सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न केले तरच या संकटाचा सामना करता येईल.



    एखाद्या देशातील दहशतवादाचा जगाच्या दुसऱ्या भागात असलेल्या देशावरही परिणाम होऊ शकतो, हे जगाने ९/११ च्या हल्ल्यानंतर मान्य केले होते आणि त्याच वेळी आपण सर्व जण एकत्र आलो होतो. या हल्ल्यापूर्वी ‘तुमचे दहशतवादी आणि आमचे दहशतवादी’ यात जग विभागले गेले होते. आता दोन दशकांनंतर पुन्हा एकदा अशीच विभागणी करण्याचे प्रयत्न होत असून यासाठी वंशवाद, राष्ट्रवाद, कट्टरतावाद अशा शब्दांचा आश्रय घेतला जात आहे.

    India warns world on terrorisam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…