विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोना संबंधित आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली तरी जर कोरोनाची लक्षणे रुग्णांमध्ये असतील, तर त्याची दखल घेऊन त्यांच्या उपचारात हयगय करू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. High court orders govt. regarding corona
अनेक रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली असता, त्याचा अहवाल नकारात्मक येत आहे; पण त्या रुग्णांमध्ये कोरोनाची संभाव्य लक्षणे आढळली असतात. अशा वेळी काही रुग्णालये रुग्णांना दाखल करण्यास नकार देतात; मात्र यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यासाठी विलंब होतो आणि संसर्गही वाढतो, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका वकील विल्सन जयस्वाल यांनी केली आहे. मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली.
राज्य सरकारने १७ मे रोजी शासकीय अध्यादेश जारी केला असून सर्व संशयित रुग्णांवरही उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. या अध्यादेशाची अंमलबजावणी काटेकोर आणि गंभीरपूर्वक करा, असे निर्देश न्यायालयाने दिले. लक्षणे असलेल्या पण वैद्यकीय चाचणी नसलेल्या व्यक्तीवर उपचार करणे कोणत्याही कारणांमुळे टाळता कामा नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकादार वकिलाने एका प्रसंगावरून तातडीने याचिका दाखल केल्याबद्दल खंडपीठाने कौतुक केले. अशा घटना डोळे उघडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असे न्यायालय म्हणाले.
High court orders govt. regarding corona
महत्त्वाच्या बातम्या
- केरळ सरकारचे 20 हजार कोटींचे कोविड पॅकेज, आरोग्य सेवा – लसीकरणावर लक्ष केंद्रित, कोणताही नवीन कर नाही
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये उद्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून एल्गार, विनायक मेटेंची माहिती
- निर्बंधांसह का असेना यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक
- ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री, अनलॉकच्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांची टीका
- रामदेव बाबा यांचे अॅलोपॅथीबाबतचे वक्तव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग ; दिल्ली उच्च न्यायालय