• Download App
    भारतात जानेवारीपासून कोरोना लसीचा पहिला डोस, डॉ. हर्षवर्धन यांची माहिती | The Focus India

    भारतात जानेवारीपासून कोरोना लसीचा पहिला डोस, डॉ. हर्षवर्धन यांची माहिती

    भारतात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात आम्ही भारतात कोरोना लसीचा पहिला डोस देण्याच्या तयारीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात आम्ही भारतात कोरोना लसीचा पहिला डोस देण्याच्या तयारीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

    first dose of corona vaccine in India from January, Dr. Harshvardhan

    हर्षवर्धन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आमची पहिली प्राथमिकता लसींची सुरक्षा आणि परिणामकारकता आहे. आम्हाला यावर तडजोड करण्याची इच्छा नाही. मला वैयक्तिकरित्या वाटते की कदाचित जानेवारीच्या काही आठवड्यात आम्ही लसीकरणास सुरुवात करू.

    भारतात सध्या एकूण 8 लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या सर्व चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. काही आगाऊ स्टेजवर आहेत तर काही शेवटच्या टप्प्यात आहेत. ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस कोविशिल्ड आहे. त्याची चाचणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा चालू असून अंतिम टप्प्यात आहे. द भारताच्या ड्रग रेगुलेटर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.

    first dose of corona vaccine in India from January, Dr. Harshvardhan

    भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि आयसीएमआर निर्मित कोवाक्सिन लस तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहे. लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने आपात्कालीन उपयोगासाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे.

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??