प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर गेल्या काही दिवसांपासून छापासत्र सुरू आहे. हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चिखलफेक सुरू आहे, असा हल्लाबोल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.Due to action of ED on Ajit Pawar ; False allegations against Wankhade by government Ministers
क्रांती रेडकर आणि तिच्या कुटुंबीयांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. समस्त महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी त्यांची माफी देखील मागितली आहे. अजित पवार प्रकरणात आता एडी देखील चौकशी सुरू करणार आहे. सोमवारी लातूर , नांदेड येथील शेतकऱ्यांना घेऊन ईडी कार्यालयात पुरावे सादर करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
- पवारांवरील छापासत्रामुळे सत्ताधारी हादरले
- वानखडेंवर आरोप, जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविले
- नवाब मलिकांकडून वानखडेंवर चिखलफेक सुरु
- गेले १२ दिवस वानखेडेंच्या धर्मावर खोटी वक्तव्ये
- वानखेडे आणि कुटुंबीयांवर अकारण चिखलफेक
- क्रांती रेडकर आणि कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहोत
- जनतेच्या वतीने मी त्यांची माफी देखील मागितली
- अजित पवार याची आता एडीकडून चौकशी होणार
- लातूर , नांदेडच्या शेतकऱ्यांना घेऊन ईडीला पुरावे