प्रतिनिधी
मुंबई – राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही.devdendra fadanavis targets thackeray – pawar govt over flood affected area compensesion delay
आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारला सुनावले.
ते म्हणाले की, यातच मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली आहे, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे.
कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
devdendra fadanavis targets thackeray – pawar govt over flood affected area compensesion delay
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू; 4 जिल्ह्यांत अलर्ट
- Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र केले दाखल, 346 पानांमध्ये 77 जणांचे जबाब
- राजीनाम्यानंतर सिद्धूंचा पहिल्यांदाच खुलासा, म्हणाले- कलंकित नेते परतणे मंजूर नाही, अखेरपर्यंत पंजाबसाठी सत्याची लढाई लढेन
- शिवसेना खा. भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ, ईडीचं समन्स, आधी निकटवर्तीयाला झाली अटक