• Download App
    मुंबईत कोरोना काळात गुन्ह्यांत वाढ, महिला सर्वाधिक असुरक्षित Crime increased in Mubali during lockdown

    मुंबईत कोरोना काळात गुन्ह्यांत वाढ, महिला सर्वाधिक असुरक्षित

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोना आणि लॉकडाऊनचा सामना नागरिकांना करावा लागत असला, तरी यामुळे महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांत घट झालेली नाही. उलट मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत मुंबईमध्ये २,६११ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. Crime increased in Mumbai during lockdown

    मागील दोन वर्षे मुंबईकर विविध निर्बंधांमुळे अडचणीत आलेले आहेत. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांना बंद झाल्यामुळे अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच आता मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महिला संबंधित गुन्ह्यांत वाढ झाली आहे.



    मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत सुमारे १,९९५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. चालू वर्षी जानेवारी ते जून यामध्ये २,६११ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा ६१६ गुन्हे वाढले आहेत.

    यापैकी ४७५ फौजदारी फिर्यादी या बलात्काराच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत. यात ३६१ प्रकरणांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले आहे. तसेच यात अल्पवयीन मुलांसंबंधित गुन्हे २८२ असून २५३ प्रकरणांचा तपास पोलिसांनी लावला आहे.

    Crime increased in Mumbai during lockdown

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??