• Download App
    मुंबईत कोरोना काळात गुन्ह्यांत वाढ, महिला सर्वाधिक असुरक्षित Crime increased in Mubali during lockdown

    मुंबईत कोरोना काळात गुन्ह्यांत वाढ, महिला सर्वाधिक असुरक्षित

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोना आणि लॉकडाऊनचा सामना नागरिकांना करावा लागत असला, तरी यामुळे महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांत घट झालेली नाही. उलट मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत मुंबईमध्ये २,६११ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. Crime increased in Mumbai during lockdown

    मागील दोन वर्षे मुंबईकर विविध निर्बंधांमुळे अडचणीत आलेले आहेत. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांना बंद झाल्यामुळे अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच आता मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महिला संबंधित गुन्ह्यांत वाढ झाली आहे.



    मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत सुमारे १,९९५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. चालू वर्षी जानेवारी ते जून यामध्ये २,६११ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा ६१६ गुन्हे वाढले आहेत.

    यापैकी ४७५ फौजदारी फिर्यादी या बलात्काराच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत. यात ३६१ प्रकरणांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले आहे. तसेच यात अल्पवयीन मुलांसंबंधित गुन्हे २८२ असून २५३ प्रकरणांचा तपास पोलिसांनी लावला आहे.

    Crime increased in Mumbai during lockdown

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??