वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भाजपने गेल्या सहा महिन्यात पाच राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत. केंद्रात २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आला. त्यानंतर विरोध वा टीका झाली तरीही मुख्यमंत्री बदलण्याचे टाळणाऱ्या भाजपाने गेल्या सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. BJP changed five chief ministers in six months; Four in North India and one in South India
लोकांची नाराजी, पक्षनेतृत्वाचा विश्वास गमाविणे किंवा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवूनच भाजपाने मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडमध्ये मार्चमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली होती. लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येणे शक्य नव्हते. त्यामुळे अवघ्या ११४ दिवसांमध्येच रावत यांना राजीनामा द्यावा लागला. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तराखंडमध्ये भाजपाने दोन मुख्यमंत्री बदलले.
आसामध्ये गेल्या मे महिन्यात भाजपा पुन्हा सत्तेत येताच सर्वानंद सोनोवाल यांना बदलून भाजपाने हेमंत बिश्वा सरमा यांची निवड केली होती. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास पक्षाने भाग पाडले होते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका सव्वा वर्षावर येऊन ठेपल्या असताना विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
BJP changed five chief ministers in six months; Four in North India and one in South India
महत्त्वाच्या बातम्या
- प्रधानमंत्री गरीब आवास योजनेतून उत्तर प्रदेशात मुसलमानांना फक्त दहा घरे मंजूर; असदुद्दीन ओवैसी यांचा अजब दावा
- भाजपने चार मुख्यमंत्री बदल्याच्या बदलण्यावरून गडकरींच्या टोलेबाजीची माध्यमांची मखलाशी, पण काँग्रेसमधील मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या अस्वस्थतेचे काय?
- Defamation case : कंगना रणावत न्यायालयात पोहोचलीच नाही, न्यायाधीश म्हणाले – जर ती पुढील सुनावणीला आली नाही तर तिच्या नावाचे अटक वॉरंट जारी केले जाईल
- आमचेही प्रश्न सोडवा; शिवसैनिकाचा टाहो मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ४०० किलोमीटरचा प्रवास