• Download App
    मोठी बातमी : सरकारच्या उपाययोजना आल्या कामी, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग । Big news Government measures work, Indian economy grows at 9.2 per cent, will continue to accelerate

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग

    Indian economy : नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांनी सोमवारी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था 9.2 टक्के दराने वाढत आहे आणि विकासाचा हा वेग आगामी काळातही कायम राहण्याची अपेक्षा आहे. उदयोन्मुख क्षेत्रांसाठी सरकारच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेचा संदर्भ देत कांत म्हणाले की, यामुळे पुढील पाच वर्षांत देशाचे उत्पादन $520 अब्ज डॉलर्सने वाढेल आणि भारताला जागतिक पुरवठा साखळीचा एक भाग बनवेल. Big news Government measures work, Indian economy grows at 9.2 per cent, will continue to accelerate


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांनी सोमवारी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था 9.2 टक्के दराने वाढत आहे आणि विकासाचा हा वेग आगामी काळातही कायम राहण्याची अपेक्षा आहे. उदयोन्मुख क्षेत्रांसाठी सरकारच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेचा संदर्भ देत कांत म्हणाले की, यामुळे पुढील पाच वर्षांत देशाचे उत्पादन $520 अब्ज डॉलर्सने वाढेल आणि भारताला जागतिक पुरवठा साखळीचा एक भाग बनवेल.

    ९.२ टक्के दराने वाढ

    AIMA (ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन) च्या एका कार्यक्रमात कांत म्हणाले, “भारत आज अभूतपूर्व पातळीवरील आर्थिक वाढ आणि तांत्रिक बदलांचा साक्षीदार आहे. अर्थव्यवस्था 9.2 टक्के दराने वाढत आहे आणि आगामी काळातही विकासाचा हा वेग कायम राहण्याची अपेक्षा आहे. यासह, आम्ही जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान आर्थिक वाढ असलेल्या देशांपैकी एक आहोत.

    सरकारने अनेक उपाययोजना केल्या

    ते म्हणाले की, देशाने कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. सरकारने यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत ज्यात GST (वस्तू आणि सेवा कर), दिवाळखोरी आणि ऋणशोधन अक्षमता संहिता, कॉर्पोरेट कर कमी करणे इत्यादींचा समावेश आहे.

    अनेक योजना सुरू केल्या

    नीती आयोगाचे सीईओ म्हणाले की, यामुळे भारताला उत्पादन क्षेत्रात जगात चॅम्पियन बनवण्यात मदत होईल. ते म्हणाले की, सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय पायाभूत सुविधा मुद्रीकरण पाइपलाइन आणि पीएम गतिशक्ती यासारख्या योजना सुरू केल्या आहेत.

    सरकारी आणि खासगी क्षेत्र देशाला पुढे नेतील

    कांत म्हणाले, “या दोन योजनांच्या एकत्रित परिणामामुळे सरकारी आणि खासगी क्षेत्र या दोघांच्या सहभागाने देशात जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधा प्रकल्पांची निर्मिती होईल. तंत्रज्ञानासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात भारत आधीच यशस्वी झाला आहे. आज देशात 814 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आणि 85 युनिकॉर्न ($1 बिलियन पेक्षा जास्त मूल्याचे स्टार्टअप) आहेत.

    Big news Government measures work, Indian economy grows at 9.2 per cent, will continue to accelerate

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!