• Download App
    दिल्लीत बंदचा फज्जा उडाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवालांची नौटंकी, पोलीसांनी नजरकैदेत ठेवल्याचा केला आरोप | The Focus India

    दिल्लीत बंदचा फज्जा उडाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवालांची नौटंकी, पोलीसांनी नजरकैदेत ठेवल्याचा केला आरोप

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रत्येकच वेळी नौटंकी करण्याची सवय आहे. आम आदमी पार्टीने (आप) दिल्ली बंदला पाठिंबा देऊनही बंदचा फज्जा उडाल्यानंतर केजरीवाल यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते, असा आरोप केला आहे. arvind kejriwal update


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रत्येकच वेळी नौटंकी करण्याची सवय आहे. आम आदमी पार्टीने (आप) दिल्ली बंदला पाठिंबा देऊनही बंदचा फज्जा उडाल्यानंतर केजरीवाल यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते, असा आरोप केला आहे. arvind kejriwal update

    अरबांकडे तक्रार केल्यास भारतीयांवर आकाश कोसळेल; केजरीवालांच्या अल्पसंख्य आयोगाच्या अध्यक्षाची धमकीची भाषा!

    भारत बंदच्या दिवशी मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार आपल्याला घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. आपने म्हटले आहे की केजरीवाल सोमवारी सिंघू सीमेवरून परतल्यावर त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. arvind kejriwal update

    त्याचबरोबर दिल्ली नगरनियमच्या तीनही महापौरांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यास लावण्यात आले. ही संधी साधून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बॅरीकेडींग करण्यात आली.

    arvind kejriwal update

    उत्तर दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की केजरीवाल घराच्या बाहेर गेले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते कपील मिश्रा यांनी केजरीवाल नौटंकी करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, केजरीवाल नजरकैदेत असल्याचा कांगावा करत आहेत. त्यांनी बाहेर येऊन पाहावे की दिल्लीतील एकही बाजार किंवा औद्योगिक परिसर बंद नव्हता. पूर्ण दिल्लीत कोठेही बंद दिसला नाही.

    Related posts

    Malegaon sugar factory election बारामती नाही उरली एकतर्फी, हा खरा माळेगावच्या निवडणुकीचा संदेश!!

    बारामतीकरांचा पवारांना आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का; माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव!!

    आणीबाणी विरोधी आंदोलनाने दिली होती काँग्रेस मुक्त शासनाची संधी; पण संघाचा द्वेष करून समाजवाद्यांनी ती गमावली!!