विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाशी १३० कोटी जनता लढत असताना कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे लॉकडाऊन तयारीशिवाय करण्यात आलेले विधान निंदनीय आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रात्री केली. पंजाब, राजस्थान या सारख्या सहा राज्यांमध्ये आधीच लॉकडाऊन केले होते. तेथे काँग्रेस सरकारे आहेत. तेथे तयारी शिवाय लॉकडाऊन करण्यात आले, असे सोनिया गांधींचे मत आहे का? असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केला. WHO ने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विविध उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. अन्य देशांना भारताचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवत सर्व देशांमध्ये गरीबांसाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. अशा स्थितीत सोनिया गांधींचे लॉकडाऊन वरील विधान काँग्रेसच्या संकुचित राजकारणाची मनोवृत्तीच सांगते. आपण अशा प्रकारच्या संकुचित राजकारणापासून दूर राहात कोरोना विरोधात लढाई एकजुटीने केली पाहिजे, असे आवाहन नड्डा यांनी केले.
Under PM @narendramodi’s leadership, India’s efforts to fight Coronavirus are being lauded domestically and globally. 130 crore Indians are united to defeat COVID-19.
— Amit Shah (@AmitShah) April 2, 2020
Yet, Congress is playing petty politics. High time they think of national interest and stop misleading people.