• Download App
    West Bengal violence ‘’४८ तासांच्या आत केंद्रीय दल तैनात करा’’, कोलकाता उच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश West Bengal violence Deploy Central Team Within 48 Hours Kolkata High Court Directs State Election Commission

    West Bengal violence : ‘’४८ तासांच्या आत केंद्रीय दल तैनात करा’’, कोलकाता उच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे विरोधकांवर आरोप

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ४८ तासांच्या आत सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्रीय दल तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. Deploy Central Team Within 48 Hours Kolkata High Court Directs State Election Commission

    पश्चिम बंगालमध्ये ८ जुलै रोजी होणाऱ्या पंचायत निवडणुकीसाठी १६ जूनपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागातून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. गुरुवारी (१५ जून) उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात कथितरित्या उमेदवारी दाखल करण्यासाठी गेलेल्या तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यात एक ठार आणि दोन गंभीर जखमी झाले.

    दरम्यान, गुरुवारीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंसाचारामागे विरोधी पक्षांचा हात असल्याचे सांगितले. महेशतला येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, उमेदवारी अर्ज भरताना विरोधी पक्ष हिंसाचार करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याची प्रतिमा मलीन व्हावी म्हणून ते असे करत आहेत. चोप्रा भागातील आजच्या हिंसाचारामागे सीपीआयएम आहे आणि दक्षिण 24 परगनामधील भांगोरमध्ये ISF टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ला करत आहे.

    West Bengal violence Deploy Central Team Within 48 Hours Kolkata High Court Directs State Election Commission

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pahalgam attack : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर “गायब”; पण ISI च्या प्रेस रिलीज मध्ये दाखवला रणगाड्यावर उभा!!

    ADR Report : एडीआर रिपोर्ट : 143 महिला खासदार आणि आमदारांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 78 जणांवर गंभीर आरोप

    Indian government : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिला मोठा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय!