• Download App
    Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक यांच्यात खलबतं; तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण!West Bengal CM Mamata Banerjee met Odisha CM Naveen Patnaik in Bhubaneswar

    Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक यांच्यात खलबतं; तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण!

    काँग्रेसला दूर ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर : लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी तिसऱ्या आघाडीची चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी भुवनेश्वरमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांची भेट घेतली. West Bengal CM Mamata Banerjee met Odisha CM Naveen Patnaik in Bhubaneswar

    विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी कोलकाता येथे नुकत्याच केलेल्या चर्चेनंतर ही भेट झाल्याने, या बैठकीला महत्त्व आले आहे. या बैठकीत काँग्रेसला दूर ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.

    एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का; संजय राऊतांना गटनेतेपदावरून हटवून गजानन कीर्तिकरांची केली नियुक्ती!

    ममता बॅनर्जी यांचे शुक्रवारी कोलकाता येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. याशिवाय ममता बॅनर्जी या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी केंद्रावर बंगालवर अन्याय आणि निधी नाकारल्याचा आरोप करत आहेत. त्याचबरोबर केजरीवाल केंद्र सरकारवर हुकूमशाही वृत्तीचा आरोप करत आहेत.

    राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की ममता बॅनर्जी आणि पटनायक यांच्या भेटीत बरेच काही होते. कारण २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान ओडिशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जींना तिसऱ्या आघाडीत नवीन पटनायक यांचा पाठिंबा हवा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

    West Bengal CM Mamata Banerjee met Odisha CM Naveen Patnaik in Bhubaneswar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज