विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. देशातील सर्वात जुना पक्ष हळूहळू अस्तित्व गमावत चालला आहे. यावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाच्या (CPP) अध्यक्षा सोनिया गांधी यांची रविवारी सकाळी दहा वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. १० जनपथ येथे बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात पक्षाच्या संसदीय रणनीती गटातील लोकांचा समावेश असेल. Two meetings in Delhi today to revive Congress
काँग्रेस कार्यकारिणीचीही बैठक
आज रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवावर चर्चा केली जाणार आहे. रविवारी दुपारी चार वाजता पक्षाच्या मुख्यालयात होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राहणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. या बैठकीचे रूपांतर गदारोळात होऊ शकते. काँग्रेसने पंजाबमध्ये आपच्या हातून सत्ता गमावली तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विशेष करिष्मा करू शकला नाही.
पुद्दुचेरीतील सत्ता गमावल्यामुळे आणि केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीत खराब कामगिरीमुळे नाराज असलेल्या G-23 च्या नेत्यांनी शुक्रवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीतून काही निष्पन्न झाले नाही. सुधारात्मक पावले उचलणे आणि संघटना मजबूत करणे, आमूलाग्र बदल सुचवण्यात आला, परंतु या आघाडीवर कोणतेही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले नाही. सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांचा राजीनामा काँग्रेसने फेटाळला आहे
काँग्रेसच्या १५९ महिला उमेदवार, एकच विजयी, बाकी सर्वांचे डिपॉझिट जप्त
‘लड़की हूं, लड़ सकती हूं’’ या मोहिमेत काँग्रेसने १५९ महिला उमेदवारांना उभे केले, त्यापैकी फक्त एकच विजयी झाली, बाकीच्यांची अनामत रक्कम जप्त झाली. एवढेच नाही तर सर्व उमेदवारांना ३००० पेक्षा कमी मते मिळाली. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ४० टक्के महिलांना तिकीट देण्याच्या आश्वासनानंतर रिंगणात उतरलेल्या महिला उमेदवारांपैकी केवळ आराधना मिश्रा मोना यांनीच विजय मिळवला.
उन्नाव सदर मतदारसंघातून काँग्रेसने बलात्कार पीडितेची आई आशा देवी यांना तिकीट दिले होते. त्यांच्या प्रचारासाठी राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कार्यकर्त्यांची टीम तैनात करण्यात आली होती, तरीही आशा देवींना केवळ १५५५ मते मिळाली. त्याचवेळी टीव्ही पत्रकारिता सोडून राजकारणात आलेल्या निदा अहमद यांना पक्षाने तिकीट दिले. निदा या राजकीय कुटुंबातील असूनही त्यांना केवळ २२५६ मते मिळाली.
Two meetings in Delhi today to revive Congress
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीचा राजीनामा देऊन राजकारणात आलेल्या राजेश्वर सिंह यांचा विक्रमी मताधिक्याने विजय
- निलेश राणे यांनी ट्विट केला दाऊदच्या भाच्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा फोटो
- उध्दव ठाकरे आणि माफिया सेनेची गेली इज्जत, किरीट सोमय्या यांची टीका
- पक्ष हवालदिल, नेते सैरभैर, पळापळ झाली सुरू, कर्नाटकातील माजी केंद्रीय मंत्र्याचा कॉँग्रेसचा राजीनामा