• Download App
    उत्तर प्रदेशात तृणमूलचा समाजवादीला पाठिंबा; ममता - अखिलेश 8 फेब्रुवारीला संयुक्त पत्रकार परिषद|Trinamool supports Samajwadi in Uttar Pradesh; Mamata - Akhilesh Joint Press Conference on 8th February

    उत्तर प्रदेशात तृणमूलचा समाजवादीला पाठिंबा; ममता – अखिलेश ८ फेब्रुवारीला संयुक्त पत्रकार परिषद

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशात तृणमूल काँग्रेस निवडणूक लढवणार नाही, तर समाजवादी पक्षाला संपूर्ण पाठिंबा देईल. येत्या 8 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उत्तर प्रदेश दौऱ्यावर येत आहेत. त्यांची समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद होईल, अशी माहिती समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष किरणमय नंदा यांनी दिली आहे.Trinamool supports Samajwadi in Uttar Pradesh; Mamata – Akhilesh Joint Press Conference on 8th February

    एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कोणतेही राजकीय अस्तित्व नसताना हे दोन्ही प्रादेशिक पक्ष उत्तर प्रदेशातील निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील सर्वात प्रबळ असणाऱ्या आणि राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या ममता बॅनर्जी मात्र तृणमूल काँग्रेसला उत्तर प्रदेशात निवडणूक मैदानात उतरवण्या ऐवजी अखिलेश यादव यांना सर्व जागांवर पाठिंबा देत आहेत.



    यातच तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या राजकीय नेतृत्वाचे वेगळे वैशिष्ट्ये दिसत आहे. येत्या 8 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशात लखनऊ, वाराणसी मध्ये अखिलेश यादव यांच्याबरोबर त्या संयुक्त पत्रकार परिषद घेतील, अशी माहिती किरणमय नंदा यांनी दिली आहे.

    किरणमय नंदा हे समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते असून ते पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडी सरकारमध्ये अनेक वर्षे मंत्री राहिले आहेत. परंतु आता समाजवादी पक्ष डावे आघाडीत राहिलेला नाही, तर त्याने ममता बॅनर्जी यांच्याबरोबर जुळवून घेतले आहे आणि त्यादृष्टीने ममता बॅनर्जी येत्या 8 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत.

    Trinamool supports Samajwadi in Uttar Pradesh; Mamata – Akhilesh Joint Press Conference on 8th February

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार