• Download App
    'तर दोन दिवस लॉक डाऊन जाहीर....' ; दिल्ली मधील वायू प्रदूषणावर न्यायाधीश रमण यांनी चिंता व्यक्त केली | 'So two days lock down announced ....'; Judge Raman expressed concern over air pollution in Delhi

    ‘तर दोन दिवस लॉक डाऊन जाहीर….’ ; दिल्ली मधील वायू प्रदूषणावर न्यायाधीश रमण यांनी चिंता व्यक्त केली

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : दिल्लीमधील वायू प्रदूषण हा गंभीर विषय आहे. भारतातील प्रमुख शहरांपैकी सर्वात जास्त प्रदुषण दिल्लीमध्ये आहे. नुकताच सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला आदेश दिला आहे. वायू प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी दोन दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात यावा. आणि एयर पोल्यूशन कंट्रोल करण्यासाठी तातडीने योग्य ती पावले उचलण्यात यावीत. असा आदेशही कोर्टाने दिला आहे.

    ‘So two days lock down announced ….’; Judge Raman expressed concern over air pollution in Delhi

    चीफ जस्टिस एन वी रमण यांनी याबाबत बोलताना म्हटले, एअर क्वालिटी इंडेक्स 500 वरून किमान 200 पॉइंट्सने तरी कमी झाला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही दोन दिवसांचा लॉक डाऊन पुरेसा आहे का? अशा प्रदूषित वातावरणात येथील लोक कसे जगतील? हे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी तातडीने लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत. येथील लोकांना आता घरामध्ये देखील मास्क घालून बसावे लागत आहे.


    वायू प्रदूषणात जगात दिल्लीचा पहिला क्रमांक; प्रदूषणास शेजारील राज्ये अधिक जबाबदार


    पंजाब आणि हरियाणा मधील गहू आणि मक्याच्या पिकांच्या शेतातील वाळलेले तन जाळून टाकल्यामुळे दिल्ली मधील प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. पीक घेतल्यानंतर दरवर्षी शेतकरी शेतातील उरलेले तन जाळून टाकतात. यासाठी लागणारी आधुनिक मशिन शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची आहेत. त्यामुळे दिल्ली गव्हर्नमेंटने त्या मशीन्स शेतकर्यांना देण्यात यावीत असा आदेश कोर्टाने दिला आहे. जेणेकरून हवा प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

    दिल्ली म्हटले थंडीमध्ये धुक्याचा देखील खूप मोठा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे तेथील शाळांना सुट्या दिल्या जातात. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत देखील कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे.

    ‘So two days lock down announced ….’; Judge Raman expressed concern over air pollution in Delhi

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार

    जागतिक व्यासपीठावर भारताच्या योगसामर्थ्याचा दिमाखदार विजय; तब्बल १०२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई!!

    पश्चिम बंगाल पोलिसांची CID टीम ममतांच्या घरी; ममता गेल्या सोनियांच्या दारी!!