विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या कथित वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या तसेच मोदी- अमित शहा यांच्यात वाद असल्याचे पसरविणाऱ्यांची हवा मलिक यांनीच काढून घेतली आहे. आपण नरेंद्र मोदी यांच्याबाबत काहीही चुकीचे बोललो नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.Satyapal Malik himself took away the air of opposition, making it clear that he did not speak wrongly about Prime Minister Narendra Modi
गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केल्याच्या वक्तव्यावर मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काही चुकीचे बोलले असे मी म्हटले नाही. अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे. ते मोदींबद्दल काहीही चुकीचे बोलले नाहीत, असे सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची ५ जानेवारीपासून पंजाब मोहीम; ४२७५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शिलान्यास!!
सत्यपाल मलिक यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर विरोधकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही लोक पंतप्रधान मोदींची दिशाभूल करतात. एक दिवस त्यांना समजेल, असे आपण व्हिडीओमध्ये म्हटल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले होते. यावरून विरोधकांच्या हातात कोलीत मिळाले होते. पंतप्रधान मोदींवर त्यावरून टीका सुरू केली होती.
जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो तेव्हा त्यांची वृत्ती खूप हट्टी होती. ते म्हणाले की, तुम्ही अमित शाहांना भेटा. अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे. मी अमित शाह यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की काही लोकांनी त्यांची दिशाभूल केली आहे आणि एक दिवस त्यांना नक्कीच समजेल, असे सत्यपाल मलिक म्हणाले.
मलिक यांच्या या वक्तव्यामुळे अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध बिघडले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबतह सत्यपाल मलिक म्हणाले की, दोघांमधील संबंध खूप चांगले आहेत. अमित शाह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे.
मलिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या स्वरात हे कायदे मागे घेतले त्यामुळे त्यांची समाजात सद्भावना वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लोकांचा दृष्टीकोन आता बदलला आहे. लोकांचा भाजपाबद्दलचा दृष्टिकोनही मवाळ झाला आहे. जे काही झाले ते खूप चांगले झाले आहे.
Satyapal Malik himself took away the air of opposition, making it clear that he did not speak wrongly about Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता, आप बनणार प्रमुख विरोधी पक्ष, तृणमूल डब्यात, कॉँग्रेस गाळात
- आरक्षण मागण्यसाठी लढायचं होतं तेव्हा ओबीसी लढायला तयार नव्हते, जितेंद्र आव्हाडच्या ओबीसींबाबत आक्षपार्ह वक्तव्यामुळे संताप
- गोव्यातही महाविकास आघाडी, संजय राऊतांवर जबाबदारी, कॉँग्रेसकडे मागितल्या सात ते आठ जागा
- Mhada Exam : गोंधळ मिटता मिटेना ! म्हाडाची परीक्षा पुन्हा लांबणीवर ; 29-30 जानेवारीला परीक्षा नाही