Rahul Gandhi : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी हे मागील काळापासून ट्विटरवर चर्चेचा विषय राहिले आहेत. याचे कारण राहुल गांधींनी ट्विटरवर मंगळवारी आपल्या पक्षाचे नेते, काही निकटवर्तीय आणि अनेक पत्रकारांसह अनेकांना अनफॉलो केले आहे. एवढेच नव्हे तर वायनाडच्या खासदार कार्यालयात काम करणारे काही लोक आणि दिल्लीत कार्यरत ज्येष्ठ पत्रकारांची नावेही यात समाविष्ट आहेत. Rahul Gandhi Twitter Account unfollow many leaders
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी हे मागील काळापासून ट्विटरवर चर्चेचा विषय राहिले आहेत. याचे कारण राहुल गांधींनी ट्विटरवर मंगळवारी आपल्या पक्षाचे नेते, काही निकटवर्तीय आणि अनेक पत्रकारांसह अनेकांना अनफॉलो केले आहे. एवढेच नव्हे तर वायनाडच्या खासदार कार्यालयात काम करणारे काही लोक आणि दिल्लीत कार्यरत ज्येष्ठ पत्रकारांची नावेही यात समाविष्ट आहेत.
राहुल गांधींच्या या कृतीची सोशल मीडियावर चर्चा होत असून राजकीय चर्चाही जोरात सुरू आहेत. आता जेव्हा वातावरण तापले, तेव्हा कॉंग्रेस पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले की, ही एक प्रथा आहे ज्यामध्ये राहुल गांधी यांचे खाते रिफ्रेश केले जात आहे. लवकरच काही लोकांची यादी तयार होईल, राहुल गांधी त्यांना ट्विटरवर फॉलो करतील, यात ज्यांना नुकतेच अनफॉलो केले आहे अशांचाही समावेश असू शकेल.
मंगळवारी राहुल गांधींनी अचानक अनेकांना अनफॉलो करायला सुरुवात केली, तेव्हा चर्चा सुरू झाली आणि प्रत्येकजण त्यातून भिन्न निष्कर्ष काढू लागला. मात्र, राहुल गांधींची टीम तयार करणाऱ्या नव्या यादीमध्ये नेते-पत्रकार आणि इतर क्षेत्रातील लोकांचा समावेश असेल, असे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसकडून जरी काही स्पष्टीकरण दिले जात असले तरी राहुल गांधी यांच्या या निर्णयाने चर्चेचे वातावरण तापले आहे. राहुल गांधींच्या भविष्यातील रणनीती तयार करण्याच्या दृष्टीनेही हे पाहिले जात आहे. राहुल गांधी काही काळासाठी ट्विटरवर आक्रमक होते, कोरोना काळात त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनच सरकारवर निशाणा साधला आहे. तर विरोधकांनी ते केवळ ट्विटरवर सक्रिय असल्यावरून लक्ष्य करत आहेत.
Rahul Gandhi Twitter Account unfollow many leaders
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccines : फायझर आणि मॉडर्नासारख्या परदेशी लसींना भारतात प्रवेशाचा मार्ग मोकळा, ट्रायलची गरज नाही
- मुंबईतील CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाच्या करारासाठी अदानी रेल्वेसह नऊ कंपन्या स्पर्धेत
- मोदी सरकारचा नवा भाडेकरू कायदा, मालमत्तेवर कोणी कब्जा करू शकणार नाही आणि भाडेकरूला अचानक घरी खाली करावे लागणार नाही
- मालमत्ता नोंदणीतून सरकारच्या खजिन्यामध्ये मार्चमध्ये ९ हजार कोटी; वर्षात ११ हजार कोटी
- ज्योतिषांकडून मुहूर्तांच्या नावावर फसवणूक, कोणत्या ज्योतिषाने सांगितले होते कोरोना येणार म्हणून, योगगुरू बाबा रामदेव यांचा सवाल