• Download App
    राहूल गांधी खोट बोलून अफवा पसरवितात, लोकांचे आयुष्य धोक्यात टाकताहेत, शिवराजसिंह चौहान यांची टीका|Rahul Gandhi spreads lies, endangers people's lives, criticizes Shivraj Sinh Chouhan

    राहूल गांधी खोट बोलून अफवा पसरवितात, लोकांचे आयुष्य धोक्यात टाकताहेत, शिवराजसिंह चौहान यांची टीका

    राहूल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य धोक्यात टाकताहेत अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.Rahul Gandhi spreads lies, endangers people’s lives, criticizes Shivraj Sinh Chouhan


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहूल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य धोक्यात टाकताहेत अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, त्यानंतरच मन की बात करा, असं म्हटले होते.

    फक्त प्रत्येक देशवासीयांपर्यंत लस पोहोचवा, मग हवे असल्यास मन की बात पण सांगा, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. यावर चौहान यांनी यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांध हे गैरसमज आणि अफवा पसरवण्याचं करत आहेत. कोरोना लसीकरणाबाबत ते करत असलेली विधानं हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.



    चौहान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण पुरवत आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी अफवा पसरवून देशातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत

    लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला कोरोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओ उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या लसींची उपलब्धता आणि येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह अनेक माहिती घेतली. लसीची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर केंद्र सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. सरकारला यावर्षी डिसेंबरपर्यंत देशातील संपूर्ण लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.

    Rahul Gandhi spreads lies, endangers people’s lives, criticizes Shivraj Sinh Chouhan

     

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- नेत्यांना भाषणापूर्वी विचार सुधारण्याची गरज, त्यांनी देशात बंधुत्व वाढवावे; परस्पर आदरही आवश्यक

    Himanta Biswa Sarma : हिमंता म्हणाले-2014 मध्ये सोनिया मला मुख्यमंत्री बनवायला तयार होत्या; राहुल यांनी नेत्यांना फोन करून परिस्थिती बदलली

    Mumbai Coast : मुंबईच्या किनाऱ्याजवळ 3 संशयास्पद तेल टँकर जप्त; इराणने म्हटले- जहाजांशी कोणताही संबंध नाही