• Download App
    दिल्लीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना राहुल गांधी भेटले। Rahul Gandhi met the family of a girl victim of a rape and murder case in Delhi

    दिल्लीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना राहुल गांधी भेटले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीत नऊ वर्षांच्या दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्या या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संसदेत आणि संसदेबाहेर घेरण्याची विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. Rahul Gandhi met the family of a girl victim of a rape and murder case in Delhi

    तृणमूळ काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी अमित शहा यांनी संसदेत येऊन दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणात निवेदन दिले तर मी मुंडण करेन, असे विचित्र आव्हान दिले आहे. तर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी जुन्या नांगल नगरमध्ये जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.



    नऊ वर्षाच्या दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून तिच्यावर तिच्या आई-वडिलांच्या संमतीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले जुन्या नांगल नगरमध्ये घटना घडली. या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची राहुल गांधींनी तिथे जाऊन भेट घेतली.

    राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अमित शहा यांना गृहमंत्री पद पेलत नाही. हाथरसपासून दिल्लीपर्यंत बलात्कारांच्या घटनांची साखळी मोठी आहे. देशात महिला – मुली सुरक्षित नाहीत आणि गृहमंत्री नुसती प्रमाणपत्रे वाटत फिरत आहेत, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. संसदेत अमित शहा यांच्यावर दिल्लीतील दलित मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी जोरदार भडीमार होणार आहे.

    Rahul Gandhi met the family of a girl victim of a rape and murder case in Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची