Sunday, 11 May 2025
  • Download App
    ''राहुल गांधी हे सध्या भारतीय राजकारणातील मीर जाफर'' लंडनमधील वक्तव्यावरून संबित पात्रांनी साधला निशाणा!Rahul Gandhi is currently the Mir Jaffer of Indian politics comments by Sambit Patra

    ”राहुल गांधी हे सध्या भारतीय राजकारणातील मीर जाफर” लंडनमधील वक्तव्यावरून संबित पात्रांनी साधला निशाणा!

    Rahul Gandhi and Sambit Patra

    (संग्रहित)

    “शहजादे को नवाब बनना है…”, असा टोलाही लगावला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाची टीका सुरूच आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये दिलेल्या वक्तव्याबाबत भाजपा संसदेपासून ते रस्त्यापर्यंत हल्लाबोल करत आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. Rahul Gandhi is currently the Mir Jaffer of Indian politics comments by Sambit Patra

    संबित पात्रा यांनी सांगितले की, ‘शहजादाला नवाब बनायचे आहे’. राहुल गांधींना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागणार आहे. परदेशात भारताचा अपमान करून कोणीही सुटू शकत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीबाबत लंडनमध्ये केलेल्या टिप्पणीबद्दल भाजपने मंगळवारी त्यांना सध्याच्या भारतीय राजकारणातील ‘मीर जाफर’ म्हणून संबोधले आणि त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे म्हटले आहे.


    ‘’विरोधी एकजूट म्हणजे दिखाऊपणा असून केवळ….’’ एकजुटीसाठी धडपडणाऱ्या विरोधकांना प्रशांत किशोर यांनी सुनावलं!


    संबित पात्रा म्हणाले, “मीर जाफरने नवाब होण्यासाठी जे काय केले आणि राहुल गांधींनी लंडनमध्ये जे केले, ते बिल्कुल तसेच आहे. ‘शहजादाला नवाब बनायचे आहे, आजच्या मीर जाफरला माफी मागावीच लागेल.” राहुल गांधी यांनी परदेशी भूमीतून भारताचा अपमान केल्याचा आरोप करत पात्रा यांनी असे म्हटले की, काँग्रेस नेत्याने देशाविरोधात बोलणे अगदी सामान्य आहे. राफेल प्रकरणातही राहुल गांधींना माफी मागावी लागली आणि आज त्यांना संसदेतही माफी मागावी लागणार आहे. राहुल गांधी हे सध्या भारतीय राजकारणातील मीर जाफर आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

    Rahul Gandhi is currently the Mir Jaffer of Indian politics comments by Sambit Patra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!