‘स्वच्छ सर्वेक्षण-2021’च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहर सलग पाचव्यांदा पहिले ठरले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज विजेत्यांना सन्मानित केले. स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये सुरत (गुजरात) दुसऱ्या क्रमांकावर आणि विजयवाडा (आंध्र प्रदेश) तिसऱ्या क्रमांकावर होते. त्याचबरोबर यूपीच्या वाराणसीला सर्वात स्वच्छ गंगा शहराचा किताब मिळाला आहे. president ram nath kovind presented swachh survekshan awards 2021 to cleanest cities in india
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘स्वच्छ सर्वेक्षण-2021’च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहर सलग पाचव्यांदा पहिले ठरले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज विजेत्यांना सन्मानित केले. स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये सुरत (गुजरात) दुसऱ्या क्रमांकावर आणि विजयवाडा (आंध्र प्रदेश) तिसऱ्या क्रमांकावर होते. त्याचबरोबर यूपीच्या वाराणसीला सर्वात स्वच्छ गंगा शहराचा किताब मिळाला आहे. स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0 अंतर्गत भारताला कचरामुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेच्या धर्तीवर या कार्यक्रमात कचरामुक्त शहरांच्या श्रेणीत प्रमाणित शहरांचा गौरव करण्यात आला.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ या उपक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना मान्यता देताना या कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. या वेळी 4320 शहरांचा समावेश स्वच्छ सर्वेक्षणात करण्यात आला असून जगातील सर्वात मोठे स्वच्छता सर्वेक्षण आहे.
5 कोटींहून अधिक प्रतिक्रिया
2016 मध्ये या हालचालीच्या सुरुवातीस सर्वेक्षणात केवळ 73 प्रमुख शहरांचा समावेश होता. यावेळी नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे यंदाच्या सर्वेक्षणाचे यशापयश ठरवले जाते. यावेळी पाच कोटींहून अधिक प्रतिक्रिया आल्या. गेल्या वर्षी ही संख्या 1.87 कोटी होती.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’बाबत मंत्रालयाने म्हटले आहे की, राज्ये आणि शहरांच्या कामगिरीमध्ये जमिनीच्या पातळीवर लक्षणीय सुधारणा झाली आहे. उदाहरणार्थ, सहा राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेशांनी तळागाळातील त्यांची कामगिरी पाच ते २५ टक्क्यांनी सुधारली आहे.
president ram nath kovind presented swachh survekshan awards 2021 to cleanest cities in india
महत्त्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे वऱ्हाड निघाले दुबईला; तिजोरीत खडखडाट असताना दौरा; ५४ अधिकारीही दिमतीला
- अहमदनगर : सेंट्रल एक्सलन्स इन्सि्टट्यूट उभारले जाणार ,३० कोटी रुपये खर्च ; उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
- तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचा हाहाकार : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
- राज्य सरकार रोज नवीन काहीतरी पुड्या सोडत ; खासगीकर करणार या राज्य सरकारच्या अफवा : गोपीचंद पडळकर
- ‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद