• Download App
    आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2 पाहायला मिळणार’, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार! Now soon Bharat Jodo Part 2 will be seen Rahul Gandhi will go from Gujarat to Meghalaya

    आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2′ पाहायला मिळणार, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार!

    महाराष्ट्र काँग्रेसचे नेतेही राज्यात समांतर मोर्चा काढणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मोदी आडनाव प्रकरणात शिक्षेला स्थगिती आणि रद्द झालेले संसद सदस्यत्व बहाल झाल्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे ‘भारत जोडो पार्ट – 2’ काढणार आहे. या अंतर्गत ते गुजरातमधून निघून मेघालयपर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर राज्यातील काँग्रेस नेतेही समांतर मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. Now soon Bharat Jodo Part 2 will be seen Rahul Gandhi will go from Gujarat to Meghalaya

    पटोले म्हणाले, “राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरात ते मेघालय असेल.” काँग्रेसचे प्रमुख नेते पश्चिम राज्यातील विविध भागात मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर सुमारे ४ हजार किलोमीटर पायी चालले होते.

    भारत जोडो यात्रा गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीमधून सुरू झाली होती. 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश आणि 130 दिवस चालल्यानंतर ही यात्रा 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये संपली. तथापि, नवीन मार्ग आणि संबंधित तारखांबद्दलची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    पटोले म्हणाले की, पदयात्रेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात बस प्रवास सुरू करू. या प्रवासात ते राज्यभर फिरणार आहेत. सभा घेण्यासोबतच लोकांशी बोलणार. सर्व नेते केंद्र व राज्य सरकारच्या उणिवा जनतेपर्यंत पोहोचवतील. सोमवारी गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी राहुल गांधींना गुजरातमधून ‘भारत जोडो यात्रा-2’ सुरू करण्यासाठी आमंत्रित केले होते. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गुजरातमधून व्हायला हवी, असे ते म्हणाले होते.

    Now soon Bharat Jodo Part 2 will be seen Rahul Gandhi will go from Gujarat to Meghalaya

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे