• Download App
    गांधीनगर नाही तर मुंबईच देशाची आर्थिक राजधानी राहणार ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक | Mumbai will be the financial capital of the country, not Gandhinagar; Minority Minister Nawab Malik

    गांधीनगर नाही तर मुंबईच देशाची आर्थिक राजधानी राहणार ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : नवाब मलिक यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेमध्ये अापले मत मांडले आहे. नवाब मलिक म्हणतात, गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी कधीही होणार नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती आणि राहील. मुंबईमध्ये बरेच मोठमोठे राजकारणी आले पण कोणीही महाराष्ट्रातील व्यापार पळवण्याचे काम केले नाही असे ते म्हणाले.

    Mumbai will be the financial capital of the country, not Gandhinagar; Minority Minister Nawab Malik

    पुढे ते म्हणतात की, मोदी सरकार सत्तेत येऊन सात वर्ष झालेली आहेत. उद्योग आस्थापन मुंबईमध्ये न होता गुजरातच्या गांधीनगरमध्ये कसे होतील? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे. नरेंद्र मोदी यांचे आदेश आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होकार यामुळे महाराष्ट्राचे बरेच मोठे नुकसान झालेले आहे, त्यामुळे जे लोक बोट दाखवत आहेत त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.


    NAWAB MALIK PRESS : नवाब मलिक कोणता गौप्यस्फोट करणार?मोठी स्क्रीन-कुर्ल्यात जय्यत तयारी ; आज घेणार पत्रकार परिषद


    भाजप विरोधकांना एकत्र आणण्याच्या मुद्द्यावरून ते म्हणतात की, शरद पवार हे चाणक्य आहेत. हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी भाजप विरोधी मोट बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. याची चिंता भाजपला लागली आहे. परंतु आजही भाजप आमच्यात कशी फूट पडेल हे बघत आहेत. मात्र त्यांनी गोव्यामधील लक्ष द्यावे, आमची चिंता करू नये. असे देखील मलिक यांनी सांगितले आहे.

    Mumbai will be the financial capital of the country, not Gandhinagar; Minority Minister Nawab Malik

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज