वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपचे सरकार अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्या अंतर्गत स्थापन केलेल्या अफगाण स्पेशल सेलला पाच दिवसांत दोन हजारांहून अधिक कॉल मदत मागण्यासाठी आले आहेत. तर सहा हजारांहून अधिक व्हॉट्सअॅप संदेशांना उत्तर देण्यात आले आहे.Modi government’s warlike efforts to conquer Mission Kabul; Two thousand calls in five days for help
अफगाणिस्तानातून भारतीयांना बाहेर पडता यावे यासाठ परराष्ट्र मंत्रालयानं अफगाण स्पेशल सेल स्थापन केला आहे. त्यावर ५ दिवसात दोन हजारांहून अधिक कॉल आले आहेत. तर ६ हजारांहून अधिक व्हॉट्सअॅप संदेशांना उत्तर देण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की १२०० हून अधिक मेलला उत्तर देऊन अडचणीत अडकलेल्या लोकांना मदत केली जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सेल अफगाणिस्तानातून भारतात येण्यासाठी उत्सुक भारतीय आणि इतर गरजू नागरिकांना मदत करत आहे. यामध्ये व्हिसा, पासपोर्ट आणि इमिग्रेशनशी संबंधित सर्व माहितीही दिली जात आहे.
काबूलमधूनच नाही तर अफगाणिस्तानच्या विविध भागातून कॉल येत आहेत. यात सुरक्षित वाटत नसलेल्या अफगाणांची संख्याही मोठी आहे. दरम्यान, रविवारी २५० पेक्षा जास्त प्रवासी ताजिकिस्तान आणि कतारची राजधानी दोहामार्गे काबूलहून भारतात पोहोचले.
तर १६८ प्रवासी विशेष हवाई दलाच्या विमानांद्वारे गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले आहेत. यापैकी १०७भारतीय नागरिक आहेत. तर २४अफगाण नागरिक आहेत. त्यात दोन अफगाणिस्तानचे संसद सदस्य नरेंद्र सिंह खालसा आणि अनारकली आहेत.
Modi government’s warlike efforts to conquer Mission Kabul; Two thousand calls in five days for help
महत्त्वाच्या बातम्या
- काबूल विमानतळाबाहेर गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू
- ममतांच्या दिल्ली चलो मुखवटा राख्यांनी बंगालमध्ये रक्षाबंधन साजरे
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतल्या बेकायदा बंगल्याचे बांधकाम पाडले
- अफगाणिस्तानातून परतलेल्या नागरिकांना केंद्र सरकार मोफत पोलिओ डोस देणार
- भगवान श्रीराम, तुमच्या चरणी कल्याण सिंह यांना स्थान द्या’; अंत्यदर्शनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावनिक उदगार