विशेष प्रतिनिधी
जम्मू,– दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या परप्रांतीय कामगारांना कुटुंबीयांसह काश्मीर खोरे सोडणे भाग पडत आहे. जम्मू आणि उधमपूर येथील रेल्वे तसेच बस स्थानकांवर अशा हजारो कामगारांची गर्दी झाली आहे. त्यांनी कुटुंबीयांसह तिकीट केंद्रांवर रांगा लावल्याचे दृश्य दिसत आहे.Migrated works left Kashmir due to terrorist
खबरदारीचा उपाय म्हणून तेथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. हे कामगार मुळ गावी आधीच परतण्यास अधीर झाले असून इतर अनेक जण परतीच्या मार्गावर आहेत. जम्मू रेल्वे स्थानकाबाहेर पाणी किंवा निवारा अशा मूलभूत सुविधा नसूनही रस्त्यावर शेकडो पुरुष, महिला आणि मुले थांबली आहेत.
काश्मीरात दर वर्षी तीन ते चार लाख स्थलांतरित कामगार येतात. यातील बहुतांश हिंदू असतात. ते प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि उत्तराखंडचे असतात. मार्च महिन्याच्या प्रारंभी कुशल आणि अकुशल कामे करण्यासाठी त्यांचे आगमन होते. पाषाणकाम, सुतारकाम, वेल्डिंग, शेती अशी कामे ते करतात. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरु होण्यापूर्वी ते परततात, मात्र यावेळी त्यांना ऑक्टोबरच्या मध्यासच परतणे भाग पडत आहे.
Migrated works left Kashmir due to terrorist
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप उभा करेल सिल्वासात उभा छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा
- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात उचलले मोठे पाऊल , 50 कोटींचा मानहानीचा दाखल केला खटला
- भारताने कोरोना लसीकरणात 99 कोटींचा टप्पा गाठला, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया यांनी ट्विटरवरून दिली माहिती
- ‘टार्गेट किलींग ‘ प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला, एजन्सी करेल पाकिस्तानचा पर्दाफाश
- CONGRESS : नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी ; दहा वर्षांपासून प्रवक्ते असणारे सचिन सावंत यांचा राजीनामा