Stop Usage Of Tricolour Made Of Plastic : स्वातंत्र्यदिनापूर्वी केंद्राने राज्यांना प्लास्टिकपासून बनवलेल्या तिरंग्याच्या वापरास परवानगी देऊ नये, असे सांगितले आहे. केंद्राने राज्यांना निर्देश दिले की, लोक प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरणार नाहीत याची राज्यांनी खात्री करावी. गैर-बायोडिग्रेडेबल वस्तूंची योग्य विल्हेवाट ही एक व्यावहारिक समस्या आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रध्वज देशातील लोकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतो आणि म्हणूनच तो आदरणीय स्थितीत असला पाहिजे. MHA Tells States To Stop Usage Of Tricolour Made Of Plastic On Independence Day
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनापूर्वी केंद्राने राज्यांना प्लास्टिकपासून बनवलेल्या तिरंग्याच्या वापरास परवानगी देऊ नये, असे सांगितले आहे. केंद्राने राज्यांना निर्देश दिले की, लोक प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरणार नाहीत याची राज्यांनी खात्री करावी. गैर-बायोडिग्रेडेबल वस्तूंची योग्य विल्हेवाट ही एक व्यावहारिक समस्या आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रध्वज देशातील लोकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतो आणि म्हणूनच तो आदरणीय स्थितीत असला पाहिजे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रत्येकाला राष्ट्रध्वजाबद्दल आपुलकी, आदर आणि निष्ठा आहे. तरीही लोकांमध्ये तसेच सरकार किंवा एजन्सीमध्ये जागरूकतेचा अभाव अनेकदा दिसून येतो. याच कारणामुळे महत्त्वाच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये कागदाच्या जागी प्लास्टिकपासून बनवलेले झेंडे वापरले जातात. कारण प्लास्टिकचे झेंडे कागदासारखे बायोडिग्रेडेबल नसतात आणि ते बराच काळ विघटित होत नाहीत.
म्हणून तुम्हाला विनंती करण्यात येत आहे की, ‘भारतीय ध्वज संहिता, 2002’च्या तरतुदींनुसार जनतेने फक्त कागदी बनावटीचे ध्वज वापरले पाहिजेत. याव्यतिरिक्त कार्यक्रमानंतर ध्वज जमिनीवरही फेकले जाऊ नयेत.
कॅबिनेट सचिवांनी दिला इशारा
दरम्यान, कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी आमंत्रित अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे की, जर ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, तर हे गंभीरपणे घेतले जाईल. सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात गौबा म्हणाले की, लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण समारंभाचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करतील. आपणा सर्वांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. आम्हाला आशा आहे की, प्रत्येक जण यात नक्कीच सहभागी होईल.
MHA Tells States To Stop Usage Of Tricolour Made Of Plastic On Independence Day
महत्त्वाच्या बातम्या
- Tokyo Olympics चा रंगतदार समारोप, बजरंग पुनियाच्या हाती भारताचा तिरंगा, आता तीन वर्षांनी पॅरिसमध्ये भिडणार चॅम्पियन्स
- Neeraj Chopra : नीरज चोप्राचा सोशल मीडियावरही धमाका, 24 तासांत 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स
- Corona Vaccination : केंद्राने राज्यांना दिले 52 कोटींहून अधिक डोस, देशात कोरोना संसर्गातही कमालीची घट
- INX Media Corruption Case : पी. चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयच्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
- Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कट होता – नवाब मलिक