विशेष प्रतिनिधी
भोपाळ : महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. महात्मा गांधींचा पुतळा हटवल्यानंतर त्या जागी गोडसेंच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांनी केली आहे.Mahatma Gandhi, then the Father of the Nation of Pakistan, Godse statue should be installed after removing his statues, statement of accused in Malegaon bomb blast
चतुवेर्दी म्हणाले, मोहनदास करमचंद गांधी यांचा या देशाशी काही एक संबंध नाही. गांधीजी पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत, त्यामुळं त्यांचा भारताशी कोणताही संबंध नाही. काँग्रेस 1947 पासून राजकारण करत आहे. मात्र, कोणतंही कारण नसताना गांधींचा फोटो नोटांवर छापण्यात आलाय.
देशात हजारो ठिकाणी गांधींचे पुतळे बसवण्यात आले आहेत. तसंच अनेक रस्त्यांना त्यांचं नावही देण्यात आलंय, याचा निषेध करत गांधीजींचा पुतळा हटवून त्या जागी नथुराम गोडसेचे पुतळे बसवण्यात यावेत अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली आहे. हा देश गांधींचा नसून महान क्रांतिकारकांचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
Mahatma Gandhi, then the Father of the Nation of Pakistan, Godse statue should be installed after removing his statues, statement of accused in Malegaon bomb blast
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय : आता रेशन दुकानांवर मिळणार फोर्टिफाइड तांदूळ, योजनेवर वर्षाला २७०० कोटी खर्च करणार सरकार
- 2050 पर्यंत देशातील 6 शहरे बुडणार : मुंबईतील एक हजार इमारती जाणार पाण्याखाली, हाजी अली आणि वरळी सी-लिंक पाण्याखाली जाणार
- RBIची नवीन सुविधा : लवकरच सर्व ATM मध्ये कार्डलेस पैसे काढता येणार, सध्या फक्त काही बँकांकडेच आहे ही सुविधा
- हाफिज सईदला शिक्षा : जमात-उद-दावाच्या प्रमुखाला दोन टेरर फंडिंग प्रकरणात ३२ वर्षांचा तुरुंगवास; आतापर्यंत ७ प्रकरणांमध्ये ६८ वर्षांची कैद