प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी म्हटले की, भारतातील लोकशाहीची 1975 मध्ये एकदाच हत्या झाली. 1975 मध्ये जे घडले ते पुन्हा कधीच घडले नाही आणि यापुढेही होणार नाही. आमचा कायद्यावर विश्वास आहे. देशात लोकशाहीचा आत्मा जिवंत आहे. रिजिजू यांनी विरोधकांना म्हटले की, तुम्ही सर्व प्रश्न निवडून आलेल्या सरकारला विचारा, पण देशाला प्रश्न करू नका.Kiren Rijiju’s reply to Sonia Gandhi, said- Democracy was murdered in 1975!!
वास्तविक, ‘द हिंदू’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सोनिया गांधींच्या लेखानंतर रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे. केंद्र सरकार लोकशाहीचे तीनही स्तंभ नष्ट करत आहे, असे सोनियांनी आपल्या लेखात म्हटले होते. यासोबतच त्यांनी सरकारवर संसदेतील विरोधकांचा आवाज दाबणे, एजन्सीचा गैरवापर करणे, माध्यमांचे स्वातंत्र्य संपवणे, देशात द्वेष आणि हिंसाचाराचे वातावरण निर्माण करणे आदी आरोप केले.
संसदेत जास्त बोलणारा म्हणतोय, बोलू दिले जात नाही
कायदामंत्री पुढे म्हणाले की, सोनिया गांधी लोकशाहीबद्दल व्याख्यान देत आहेत का? त्यांनी तसे करणे टाळावे. रिजिजू म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याबद्दलचे वक्तव्य पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. राहुल गांधींबद्दल ते पुढे म्हणाले की, जी व्यक्ती संसदेत सर्वात जास्त बोलते, ती म्हणते की, बोलू दिले जात नाही.
Kiren Rijiju’s reply to Sonia Gandhi, said- Democracy was murdered in 1975!!
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
- पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य; आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे अदा करण्यात आले दावे
- ठाकरे – पवार सिल्वर ओकवर भेट; महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा की काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट??
- Karnataka election : भाजपाने १८९ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत ५२ नवीन नावं