• Download App
    ‘IRCTC’ सर्व्हर पाच तास ठप्प, भारतीय रेल्वेचे प्रचंड नुकसानं; जाणून घ्या, नेमकं काय घडलं? IRCTC server down for five hours heavy loss to Indian Railways

    ‘IRCTC’ सर्व्हर पाच तास ठप्प, भारतीय रेल्वेचे प्रचंड नुकसानं; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

    IRCTC ने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे अॅप आणि वेबसाइट आज (मंगळवार) सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे पाच तास बंद राहिल्याने आयआरसीटीसीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. IRCTC ने ट्विट करून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून लोकांना तिकीट काढण्यात अडचणी येत होत्या. IRCTC server down for five hours heavy loss to Indian Railways

    प्राप्त माहितीनुसार, आयआरसीटीसीने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे आणि यासंदर्भात काही नंबरही आपल्या वेबसाइटवर टाकले आहेत. जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास त्या क्रमांकावर फोन किंवा मेसेज करून माहिती मिळवता येईल.  वेबसाईट ओपन केल्यावर डाउनटाइमचा मेसेज दिसत होता. अॅपच्या मेंटेनन्समध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अॅपचा सिग्नल गेला आणि त्याचा सर्व्हर डाउन झाला.

    तत्काळ बुकिंगमध्ये अडचणी आल्या

    जेव्हा वेबसाइट डाउन होती, तेव्हा तत्काळ बुकिंगची वेळ आली होती, ज्यामुळे तत्काळ बुकिंग करणार्‍या अनेक वापरकर्त्यांना खूप मनस्तापाला सामोरे जावे लागले. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर IRCTCकडे मदत मागितली, तर अनेक वापरकर्त्यांनी स्क्रीनशॉट शेअर करून रेल्वेकडून उत्तरे मागितली. याशिवाय असेकाही प्रवासी पुढे आले, ज्यांच्या खात्यातून सुमारे 5-5 वेळा पैसे कापले गेले. यावर IRCTC ने 100 टक्के परतावा देण्याची घोषणा केली आहे.

    IRCTC server down for five hours heavy loss to Indian Railways

    Related posts

    इंडोनेशियात करतो मोदींच्या धोरणांची कॉपी; इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांची जाहीर स्तुती; भारतीय निवडणूक आयोगाची देखील सराहना!!

    TMC Split Update : ममता गटाने म्हटले- TMC वरील बंडखोर गटाचा दावा खोटा; निवडणूक आयोगाला सांगितले- पक्षघटनेनुसार सर्व समित्या 2027 पर्यंत वैध

     Manipur News : मणिपूरच्या उखरूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात 2 जवान शहीद; 40 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू