• Download App
    रशिया, युक्रेन वादात भारताची विश्वामित्र भूमिका; युद्ध संघर्ष टाळण्याचे दोन्ही देशांना आवाहन । India's Vishwamitra role in the Russia-Ukraine dispute; Appeal to both countries to avoid war

    रशिया, युक्रेन वादात भारताची विश्वामित्र भूमिका; युद्ध संघर्ष टाळण्याचे दोन्ही देशांना आवाहन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा भडका जगाला परवडणारा नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी संघर्ष टाळून जगाला युद्धाच्या खाईत लोटु नये, अशी विश्वामित्र भूमिका भारताने घेतली आहे. India’s Vishwamitra role in the Russia-Ukraine dispute; Appeal to both countries to avoid war

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी केव्हा पडेल याचा नेम नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनच्या दोन प्रांताना स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे संघर्ष आणखी चिघळण्याचा धोका आहे.



    या घडामोडीच्या पार्श्वभूमिवर भारताने तटस्थ भूमिका घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
    या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका मांडताना टीएस त्रिमूर्ती म्हणाले, हा प्रश्न चर्चेने सोडविला पाहिजे. युद्ध जगाला परवडणारे नाही. दोन्ही देशांतील संघर्ष वाढणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. लष्करी कारवाईने परिसरातील तणाव आणि शांतता नष्ट होण्याचा धोका आहे. तसेच त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील.

    India’s Vishwamitra role in the Russia-Ukraine dispute; Appeal to both countries to avoid war

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Suvendu Adhikari : सुवेंदूंची घोषणा- ममता सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार; महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी एचसीचे न्यायाधीश करतील

    Russian Crude Oil : भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील; सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!