प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून भारताने श्रीनगरमध्ये जी-20 बैठकीची तारीख निश्चित केली आहे. भारताने शुक्रवारी G-20 बाबत सांगितले की, पर्यटनावरील कार्यगटाची बैठक 22 ते 24 मे दरम्यान श्रीनगरमध्ये होणार आहे.India’s blow to China-Pakistan, date of G-20 meeting fixed in Kashmir after Arunachal, both countries object
पाकिस्तान आणि चीनला पर्यटनावरील G-20 वर्किंग ग्रुपची बैठक येथे व्हावी असे वाटत नव्हते. त्यासाठी पाकिस्तानने सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि चीनमधूनही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बैठक श्रीनगरमध्येच होणार असल्याचे भारताने आता स्पष्ट केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरुणाचल प्रदेशप्रमाणेच चीन श्रीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीपासूनही दूर राहू शकतो.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बैठका
वृत्तानुसार, श्रीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीची तयारी गेल्या वर्षीच सुरू झाली होती. सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये G-20 बैठका आयोजित केल्या जात आहेत हे विशेष. हे लक्षात घेऊन अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही बैठका झाल्या. चीन आणि पाकिस्तानने यावर आक्षेप घेतला होता. चीन स्वतः अरुणाचल प्रदेशावर दावा करतो, तर वास्तव हे आहे की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे.
चीन SCO बैठकीत सहभागी होण्याची शक्यता
येत्या काही महिन्यांत बीजिंगसोबत अनेक प्रस्तावित उच्चस्तरीय चर्चेदरम्यान श्रीनगरमध्ये जी-20 बैठकही होणार आहे. SCO बैठकीसाठी चीनचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री लवकरच भारताला भेट देतील अशी अपेक्षा आहे. जुलैमध्ये होणाऱ्या SCO शिखर परिषदेच्या तारखा निश्चित करण्यासाठी भारत सध्या चीन, रशिया आणि इतर सदस्य देशांच्या संपर्कात आहे. जर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या बैठकीला आले, तर एप्रिल 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांची पहिली द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे.
India’s blow to China-Pakistan, date of G-20 meeting fixed in Kashmir after Arunachal, both countries object
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येत रामलल्लाचे घेणार दर्शन, लखनऊला पोहोचल्यावर केले ट्विट
- कोरोना महामारीचा डेटा मागितल्यावर चीनचे बेताल प्रत्युत्तर, WHOला इतर देशांचे टूल न बनण्याचा इशारा
- राहुल आता गप्प, पण पवारच पुन्हा काढतात सावरकरांचा विषय; काँग्रेस हायकमांड तीव्र नाराज; पवारांच्या “दुखऱ्या नसा” दाबण्याचे सूचक इशारे
- तामिळनाडूतील दह्याच्या वादानंतर आता कर्नाटकात अमूल VS नंदिनी; काँग्रेसचा आरोप- गुजरात मॉडेलची गरज नाही! वाचा सविस्त