• Download App
    संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भारताकडे येणार, समतोलासाठी उपयुक्त बाब। India will get UN security council presidentship

    संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भारताकडे येणार, समतोलासाठी उपयुक्त बाब

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : पुढील महिन्यात भारताकडे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे फिरते अध्यक्षपद येणार आहे. या समितीमध्ये अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांसाठी समावेश झाला आहे. एका महत्त्वाच्या काळात भारताचा सुरक्षा समितीमध्ये समावेश झाला आहे. India will get UN security council presidentship

    भारतासारख्या मोठ्या आकाराच्या आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाच्या सुरक्षा समितीमधील समावेशामुळे समतोल साधला गेला असल्याचे संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले. कोरोना काळ आणि कायमस्वरुपी सदस्यांमधील तणाव यामुळे सुरक्षा समितीमधील एकसंधतेला तडे गेले आहेत.



    अशा वेळी भारताच्या समावेशाने समतोल आणि समन्वय साधला गेला आहे,’ असे तिरुमूर्ती यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. या दोन वर्षांच्या काळात आणि अध्यक्षपदाच्या एका महिन्याच्या काळात महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेण्यास आणि जबाबदारी खांद्यावर घेण्यासही भारत सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले.

    India will get UN security council presidentship

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??