• Download App
    भारताची धावसंख्या ४५० च्या पुढे; जडेजा- अश्विनची शतकी भागीदारी। India score 450 ahead

    भारताची धावसंख्या ४५० च्या पुढे; जडेजा- अश्विनची शतकी भागीदारी

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड : मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे आणि रवींद्र जडेजा आणि अश्विन मैदानावर उभे आहेत. त्यांची अर्धशतके झाली असून दोघांमध्ये १०० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. भारताची धावसंख्या ४५० च्या पुढे गेली आहे. India score 450 ahead

    कसोटी क्रिकेटच्या इतिहासात संघाच्या पहिल्या आठ फलंदाजांनी कसोटी डावात २५ पेक्षा जास्त धावा करण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. विशेष म्हणजे भारताने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कामगिरी केली होती.जडेजाने पूर्ण केले शतक डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजाने शानदार फलंदाजी करताना शतक पूर्ण केले. त्याने १६० चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले.



    रवींद्र जडेजा आणि अश्विनने मिळून भारताच्या ४५० धावा पूर्ण करून श्रीलंकेच्या गोलंदाजांना विकेट्ससाठी आसुसले. भारतीय जोडी संघाला मोठ्या आणि मजबूत धावसंख्येकडे घेऊन जात आहे. दरम्यान, भारताने ४५० धावा पूर्ण केल्या आहेत. १०८ षटकांनंतर भारताची धावसंख्या: ४५१/६ रवींद्र जडेजा (९३), अश्विन (५६)

    जडेजा-अश्विनची शतकी भागीदारी

    रवींद्र जडेजा आणि अश्विन या हिट जोडीने शानदार फलंदाजी करताना पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली आहे. दोघांमध्ये सातव्या विकेटसाठी १०० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.

    India score 450 ahead

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!