नवी दिल्ली – भारताने ब्राझील, जर्मनी आणि जपान समवेत संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीच्या विस्तारासाठीची आग्रही मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या निमित्ताने न्यूयॉर्क येथे काल भारत, जपान, जर्मनी आणि ब्राझील या जी-४ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होऊनसंयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीच्या विस्ताराची मागणी करणारे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. India demand for UNCC reforms
दरम्यान, आमसभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्याबाबत बोलणार असून यादरम्यान भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठीची दावेदारी देखील मांडली जाणार आहे.
मोदींच्या अमेरिका दौऱ्याआधी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी याबाबतचे संकेत दिले होते.भारतासोबतच जपान, जर्मनी आणि ब्राझील या देशांचीही सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाची मागणी आहे. सद्यःस्थितीत या सुरक्षा समितीच्या अस्थायी सदस्य असलेल्या भारताकडे अध्यक्षपद आहे. तर अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि चीन हे पाच स्थायी सदस्य आहेत.
India demand for UNCC reforms
महत्त्वाच्या बातम्या
- PM MODI US VISIT : अमेरिका दौऱ्यात ‘डिजिटल इंडिया’चा नारा;पंतप्रधान मोदींनी घेतली Qualcomm च्या सीईओंची भेट; नवीन व्यापारी संधी शोधणार-बैठकीत एकमत
- पाकिस्तानी आणि अफगाण दहशतवादी विस्कळीत करू शकतात सणासुदीचा आनंद , गुप्तचर संस्थांनी जारी केला अलर्ट
- AURANGABAD RAPE CAAE : बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादीचे मेहबुब शेख यांना दणका-तपास राजकीय दबावाखाली-बी समरी रिपोर्ट रद्द; पुन्हा तपासाचे न्यायालयाचे आदेश
- सरकार पोहचेल आयुषमान भारत लाभार्थ्यांपर्यंत , गावोगावी जाऊन बनवले जात आहे कार्ड , जाणून घ्या काय आहे सरकारचे लक्ष्य