• Download App
    कोरोनाबाबत भारताचा अंदाज चुकला, निर्बंध लवकर उठवल्याने दुसरी लाट ठरली घातक India cant recognize second wave

    कोरोनाबाबत भारताचा अंदाज चुकला, निर्बंध लवकर उठवल्याने दुसरी लाट ठरली घातक

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि लशींचा तुटवडा, आरोग्य सेवकांची कमतरता जाणवत आहे. भारतातील कोरोनाच्यार दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाचे कारण म्हणजे साथ संपुष्टात आल्याचा भारताचा चुकीचा अंदाज आणि सर्व व्यवहार वेळेपूर्वी सुरू करणे, हे असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि साथरोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे. India cant recognize second wave

    कोरोनाचा पहिला टप्पा म्हणजे वास्तवात एक लाट होती. पण त्यानंतर कोरोनाची साथ संपल्याचे चुकीचे अनुमान काढून भारताने सर्व निर्बंध वेळेपूर्वी हटविण्यास सुरुवात केली. ही घाईमुळेच दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम भारतात पाहायला मिळत आहेत, असे डॉ. फौसी यांनी कोरोना प्रतिसादावरील चर्चेदरम्यान सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार आणि निवृत्तीवेतन समितीसमोर सांगितले.



    भारतावरून अमेरिकेलाही धडे मिळाले, असल्याचा सूर चर्चासत्रात उमटला. त्यानुसार डॉ. फौसी यांनी पुढील मुद्यांवर भर देण्याची सूचना केली. कोणतीही परिस्थिती कमी लेखू नये. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणे आवश्यक आहे. जागतिक साथकाळात स्वतःच्या देशापलीकडे विचार करीत अन्य देशांना सहकार्य करावे. अशा काळात विशेषतः जगभरातील लसीकरणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

    या चर्चासत्राच्या अध्यक्षा व सिनेटर पॅटी मुरे म्हणाल्या की, कोरोनामुळे भारतात निर्माण झालेली भयानक स्थितीमुळे एक दुःखदायक वास्तव समोर येत आहे, ते म्हणजे सर्व ठिकाणी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत आटोक्यात येत नाही, तोपर्यंत अमेरिका ही जागतिक साथ संपुष्टात आणू शकत नाही.

    India cant recognize second wave

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची