पूर्व दिल्लीतील भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना ‘ISIS काश्मीर’कडून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. खासदार गंभीर यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असून त्यांना ‘इसिस काश्मीर’कडून जिवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप केला आहे. Gautam Gambhir claims he is receiving death threats from ISIS Kashmir
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना ‘ISIS काश्मीर’कडून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. खासदार गंभीर यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असून त्यांना ‘इसिस काश्मीर’कडून जिवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गौतम गंभीर यांना जिवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. या मेलनंतर दिल्ली पोलिसांनी गौतम गंभीर यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.
डीसीपी चौहान यांनी माध्यमांना सांगितले की, ‘इसिस काश्मीर’कडून धमकीचा मेल आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चौहान यांनी सांगितले की, गंभीर यांनी दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली.”
दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेबाबत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे. गौतम गंभीर यांनी अजिंक्य रहाणेच्या सध्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले असून, रहाणे टीम इंडियाचा सदस्य म्हणून स्वत:ला भाग्यवान समजावे, असे ते म्हणाले.
अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये नाही. टीम इंडियासाठी केवळ कसोटी फॉरमॅट खेळणाऱ्या रहाणेने काही निवडक सामने वगळता कोणतीही विशेष कामगिरी दाखवलेली नाही. कानपूर कसोटीसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून रहाणे या सामन्यात संघाचे नेतृत्व करणार आहे. रहाणेच्या इंग्लंडमधील कामगिरीनंतर त्याचे संघात असणे आणि संघाचे कर्णधारपद मिळणे हे रहाणेचे भाग्यच आहे, असे गंभीर म्हणाला.