• Download App
    महाराष्ट्रातील महाविद्यालये सुरू, ठाकरे – पवार सरकार आता लसीकरण करणार|Colleges in Maharashtra open, Thackeray-Pawar government will now vaccinate

    महाराष्ट्रातील महाविद्यालये सुरू, ठाकरे – पवार सरकार आता लसीकरण करणार

    प्रतिनिधी

    मुंबई – कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ती ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहेत.कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत.Colleges in Maharashtra open, Thackeray-Pawar government will now vaccinate

    त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.मुंबईच्या सिड्नॅहम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सामंत बोलत होते.



    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

    ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनीही सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी. महाविद्यालयांनीही विद्यार्थी-पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले.

    विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ऑनलाईन – ऑफलाईन परीक्षा, कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

    Colleges in Maharashtra open, Thackeray-Pawar government will now vaccinate

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kharge : खरगे म्हणाले- मोदी दहशतवादी, नंतर म्हणाले- माझ्या म्हणण्याचा अर्थ होता मोदी लोकांना व विरोधी पक्षांना घाबरवतात-धमकावतात

    Virudhunagar : तामिळनाडू फॅक्टरी स्फोट- मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 25 झाली; यापैकी 20 एकाच गावातील; शेडमध्ये 4 ऐवजी 40 मजूर काम करत होते

    Arvind Kejriwal : जजना हटवण्याची केजरीवालांची याचिका फेटाळली; जस्टिस स्वर्णकांता म्हणाल्या- बाजूला झाले तर संदेश जाईल की दबाव टाकून हटवू शकतात