• Download App
    आजम खान बाहेर येणे अखिलेश यादवांनाच नकोय कारण त्यांच्या खुर्चीला धोका; योगींचा हल्लाबोल!! Akhilesh Yadav doesn't want Azam Khan to come out

    UP voting : आजम खान बाहेर येणे अखिलेश यादवांनाच नकोय कारण त्यांच्या खुर्चीला धोका; योगींचा हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशात 55 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यात पक्षाचे वादग्रस्त नेते आझम खान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.Akhilesh Yadav doesn’t want Azam Khan to come out

    आजम खान सध्या तुरुंगात आहेत आणि ते बाहेर येणे अखिलेश यादव यांना नको आहे. कारण अखिलेश यादव यांच्या खुर्चीला त्यांच्यामुळे धोका होईल अशी भीती त्यांना वाटते, असे खळबळजनक वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. आजम खान यांचा मतदारसंघ रामपूर येथे नुकतेच मतदान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

    आझम खान यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ते तुरुंगात आहेत. यांना जामीन मिळाला नाही ही बाब न्यायप्रविष्ट आहे. याचा सरकारशी काही संबंध नाही पण मुळात आजम खान बाहेर येणे हे अखिलेश यादव यांना नको आहे. कारण त्यांच्यामुळे अखिलेश यादव यांच्या खुर्चीला धोका उत्पन्न होतो. अखिलेश यादव यांना प्रामाणिकपणे विचारा आणि त्यांना प्रामाणिकपणे उत्तर द्यायला सांगा. ते हेच उत्तर देतील की आजम खान बाहेर यायला नको आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

    मतदान सुरू होतानाच योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केल्याने उत्तर प्रदेश आणि रामपूरच्या राजकारणात एक वेगळी खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतानाही दिसत आहे. आजम खान आणि अखिलेश यादव यांच्यात नेमके कशामुळे मतभेदाची दरी रुंदावली आहे यावर राजकीय वर्तुळात खल सुरू झाला आहे. मतदान सुरू होतानाच योगी आदित्यनाथ यांनी हल्लाबोल करण्याची कारणेही लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहेत.

    Akhilesh Yadav doesn’t want Azam Khan to come out

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे