• Download App
    आजम खान बाहेर येणे अखिलेश यादवांनाच नकोय कारण त्यांच्या खुर्चीला धोका; योगींचा हल्लाबोल!! Akhilesh Yadav doesn't want Azam Khan to come out

    UP voting : आजम खान बाहेर येणे अखिलेश यादवांनाच नकोय कारण त्यांच्या खुर्चीला धोका; योगींचा हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशात 55 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यात पक्षाचे वादग्रस्त नेते आझम खान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.Akhilesh Yadav doesn’t want Azam Khan to come out

    आजम खान सध्या तुरुंगात आहेत आणि ते बाहेर येणे अखिलेश यादव यांना नको आहे. कारण अखिलेश यादव यांच्या खुर्चीला त्यांच्यामुळे धोका होईल अशी भीती त्यांना वाटते, असे खळबळजनक वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. आजम खान यांचा मतदारसंघ रामपूर येथे नुकतेच मतदान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

    आझम खान यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ते तुरुंगात आहेत. यांना जामीन मिळाला नाही ही बाब न्यायप्रविष्ट आहे. याचा सरकारशी काही संबंध नाही पण मुळात आजम खान बाहेर येणे हे अखिलेश यादव यांना नको आहे. कारण त्यांच्यामुळे अखिलेश यादव यांच्या खुर्चीला धोका उत्पन्न होतो. अखिलेश यादव यांना प्रामाणिकपणे विचारा आणि त्यांना प्रामाणिकपणे उत्तर द्यायला सांगा. ते हेच उत्तर देतील की आजम खान बाहेर यायला नको आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

    मतदान सुरू होतानाच योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केल्याने उत्तर प्रदेश आणि रामपूरच्या राजकारणात एक वेगळी खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतानाही दिसत आहे. आजम खान आणि अखिलेश यादव यांच्यात नेमके कशामुळे मतभेदाची दरी रुंदावली आहे यावर राजकीय वर्तुळात खल सुरू झाला आहे. मतदान सुरू होतानाच योगी आदित्यनाथ यांनी हल्लाबोल करण्याची कारणेही लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहेत.

    Akhilesh Yadav doesn’t want Azam Khan to come out

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Rohingya : बंगालच्या उपसागरात दोन बोटी बुडाल्या, 500 मृत्यूंची शंका; बहुतेक रोहिंग्या प्रवासी होते, खराब हवामानामुळे अपघात

    Sant Rampal’ : रामपाल म्हणाला-राम मूर्तीत प्राण असते तर चोर पकडले गेले असते; रामाने चोरांना बाण का मारला नाही

    Sonam Wangchuk : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- प्रत्येक जीव महत्त्वाचा; केंद्र-दिल्ली सरकारने दररोज वैद्यकीय तपासणी करावी