• Download App
    Corona Vaccine : 8 राज्यांनी लसीचे 2.5 लाख डोस वाया घालवले, लस वाचवण्यात तामिळनाडू सर्वात पुढे, महाराष्ट्राचा 5वा क्रमांक । 29 States And Union Territories Saved 62 Crores By Using 41 Lakh Corona Vaccine Doses To Be Wasted

    Corona Vaccine : ८ राज्यांनी लसीचे २.५ लाख डोस वाया घालवले, लस वाचवण्यात तामिळनाडू सर्वात पुढे, महाराष्ट्राचा 5वा क्रमांक

    Corona Vaccine : एकीकडे कोरोना रोखण्यासाठी लसींची कमतरता असल्याची ओरड केली जाते. तर दुसरीकडे, केंद्राने दिलेल्या लसीपैकी सुमारे 2.5 लाख डोस देशातील 8 राज्यांमध्ये वाया गेले. दरम्यान, 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 41 लाखांहून अधिक डोस वाचवण्यातही आले. यामुळे केंद्र सरकारने सुमारे 62 कोटी रुपयांची बचत केली, तर 8 राज्यांमध्ये लसीचा अपव्यय झाल्यामुळे सरकारला सुमारे 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 9 States And Union Territories Saved 62 Crores By Using 41 Lakh Corona Vaccine Doses To Be Wasted


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकीकडे कोरोना रोखण्यासाठी लसींची कमतरता असल्याची ओरड केली जाते. तर दुसरीकडे, केंद्राने दिलेल्या लसीपैकी सुमारे 2.5 लाख डोस देशातील 8 राज्यांमध्ये वाया गेले. दरम्यान, 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 41 लाखांहून अधिक डोस वाचवण्यातही आले. यामुळे केंद्र सरकारने सुमारे 62 कोटी रुपयांची बचत केली, तर 8 राज्यांमध्ये लसीचा अपव्यय झाल्यामुळे सरकारला सुमारे 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

    माहितीनुसार, 1 मे ते 13 जुलैदरम्यान देशभरात 2,49,648 लसीचे डोस वाया गेले. तर या काळात देशात 41,11,516 डोस वाचवले गेले. वास्तविक, लस कंपन्या एका कुपीमधून 10 डोस देत असतात. तर कुप्यांमध्ये या निश्चित डोसपेक्षा थोडी जास्त लस असते. हे गृहीत धरलेला अपव्यय म्हणून गणले जाते. परंतु हे वाया जाणारे प्रमाण राज्य सरकारांच्या लसीकरण केंद्रांवरदेखील वापरले गेले आहे.

    मध्य प्रदेशने राजस्थानपेक्षा जास्त लसीचे डोस वाचवले

    देशात वाया जाणारी लस वाचवण्याच्या बाबतीत केरळचे नाव सर्वप्रथम पुढे आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केरळच्या या पद्धतीचे कौतुक केले. पण गेल्या 74 दिवसांची आकडेवारी दर्शवते की, तामिळनाडू या कामात आघाडीवर आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल आहे. राजस्थानने 2,46,001 डोस वाचवले आहेत, तर मध्य प्रदेशने 3,55,259 डोस वाचवले आहेत. तर महाराष्ट्राने 3,59,493 डोस वाचवले आहेत.

    कोणत्या राज्याने किती डोस वाचवले

    तामिळनाडू – 5,88,243 डोस
    पश्चिम बंगाल – 4,87,147 डोस
    गुजरात – 4,62,819 डोस
    केरळ – 3,92,409 डोस
    महाराष्ट्र – 3,59,493 डोस

    बिहारमध्ये सर्वाधिक 1.26 लाख डोस वाया गेले

    1 मेपासून, देशभरात अशी फक्त आठ राज्ये आहेत जिथे वेगवेगळ्या कारणांमुळे सुमारे 2.5 लाख लस डोस वाया गेले. बिहारमध्ये सर्वात जास्त एक लाख 26 हजार लसीचे डोस वाया गेले. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये 32,680 डोस वाया गेले आणि त्रिपुरामध्ये 27,252, दिल्लीमध्ये 19,989 आणि पंजाबमध्ये 13,613 डोस वाया गेले आहेत.

    9 States And Union Territories Saved 62 Crores By Using 41 Lakh Corona Vaccine Doses To Be Wasted

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : 2047 पर्यंत देशातील अणुऊर्जा उत्पादन 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर

    फडणवीस केंद्राची 50 टक्के भागीदारी मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर मेट्रो विस्तार शक्य

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!