• Download App
    'वन नेशन-वन इलेक्शन'वर NDAचं पारडं होतयं भारी, YSRCP ने समर्थन करत 'INDIA' आघाडीला दिला धक्का! YSRCPs support for One Nation One Election shocked the INDIA Alliance

    ‘वन नेशन-वन इलेक्शन’वर NDAचं पारडं होतयं भारी, YSRCP ने समर्थन करत ‘INDIA’ आघाडीला दिला धक्का!

    सरकारने  समिती स्थापन केले असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तिचे अध्यक्ष बनवले  आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 18 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. ही घोषणा झाल्यापासून विरोधी पक्षांमध्ये नाराजी वाढली आहे. विशेष अधिवेशनात ‘वन नेशन-वन इलेक्शन’शी संबंधित विधेयक आणले जाण्याची शक्यता आहे. सरकारने ‘एक देश-एक निवडणूक’ या समितीची स्थापना केली असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तिचे अध्यक्ष बनवले  आहे. YSRCPs support for One Nation One Election shocked the INDIA Alliance

    विशेष अधिवेशनात ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक आणण्याच्या बाबतीत संसदेतील आकडेवारीचा विचार केला जात आहे, कारण या आकडेवारीच्या आधारेच विधेयकाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. बरं, या आकडेवारीत सत्ताधारी पक्ष आतापासूनच मजबूत होऊ लागला आहे, कारण काही बिगर भाजप पक्षही त्याच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत. ‘वन नेशन-वन इलेक्शन’च्या चर्चेदरम्यान, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष YSRCP ने ‘I-N-D-I-A’ ला झटका दिला आहे आणि ‘वन नेशन-वन इलेक्शन’च्या समर्थनार्थ उभा राहिला आहे.

    वायएसआरसीपीचे सरचिटणीस व्ही विजयसाई रेड्डी यांनी शनिवारी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या प्रस्तावाची बाजू मांडताना सांगितले की, त्यात अनेक सकारात्मक गोष्टी आहेत आणि हजारो कोटी रुपयांची बचत करण्यात मदत होऊ शकते. विजयसाई रेड्डी हे स्वतः आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्षाचे राज्यसभा सदस्य आहेत.

    YSRCPs support for One Nation One Election shocked the INDIA Alliance

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nishikant Dubey : BJP खासदार म्हणाले – राहुल गांधी म्हातारे झाले; लग्न न केल्याने तुम्ही तरुण राहाल असे नाही; परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले

    Gujarat ATS : गुजरात ATSने 3 ISIS दहशतवाद्यांना अटक केली; देशात विविध ठिकाणी हल्ल्यांची योजना आखत होते

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- अडवाणींना एकाच घटनेपुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही, काँग्रेसने म्हटले- ते नेहमीच वैयक्तिक मते मांडतात; पक्ष असहमत