• Download App
    राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याएवढाच ज्ञानवापीचा निर्णय महत्त्वाचा; व्यास तळघरात पूजेचा अधिकार; हे व्यास तळघर आहे तरी काय?? What is ‘Vyasji ka Tehkhana’, the Gyanvapi complex part where Varanasi court allowed pooja?

    राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याएवढाच ज्ञानवापीचा निर्णय महत्त्वाचा; व्यास तळघरात पूजेचा अधिकार; हे व्यास तळघर आहे तरी काय??

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : अयोध्येतील राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याचा निर्णय तत्कालीन न्यायाधीश के. एम. पांडे यांनी 1 फेब्रुवारी 1986 रोजी दिला होता. हा निर्णय रामजन्मभूमीची संपूर्ण केस उलगडण्यासाठी जेवढा महत्त्वपूर्ण ठरला, तेवढाच आजचा ज्ञानवापी मधल्या व्यासांच्या तळघरात पूजाधिकार देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. ही माहिती हिंदू पक्षाचे वकील विष्णु शंकर जैन यांनी दिली. जैन यांनी दिलेल्या या माहितीतून ज्ञानवापीतल्या व्यास तळघरातील पूजेचे कायदेशीर महत्त्व अधोरेखित होते What is ‘Vyasji ka Tehkhana’, the Gyanvapi complex part where Varanasi court allowed pooja?

    पण ज्ञानवापीमध्ये हे व्यास तळघर नेमके कुठे आहे आणि त्याची नेमकी केस काय होती याचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

    ज्ञानवापीतील व्यासांच्या तळघराला हिंदीत “व्यासजी का तहखाना” असे म्हणतात म्हणजे तो व्यास कुटुंबीयांच्या नावाने असलेला भाग आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने व्यास धर्मगुरूच्या कुटुंबाला पूजेची परवानगी दिली आहे. “व्यासजी का तहखाना” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू देवतांची पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. ज्ञानवापी संकुलाती दक्षिणेकडील भागात हे व्यास तळघर आहे.

    वादी आणि श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने नामनिर्देशित पुजारी किंवा पुजारी यांनी केलेल्या मूर्तींच्या पूजेसाठी येत्या 7 दिवसांत आवश्यक ती व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी हा आदेश दिला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांच्या आत व्यवस्था करावी लागेल, असे हिंदू बाजूचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले.

    मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मसाजिद कमिटी (AIMC) विरुद्ध शैलेंद्र कुमार पाठक व्यास यांनी ही केस दाखल केली होती त्यांचा दावा न्यायालयाने मान्य करून पूजेचा अधिकार देण्याचा निर्णय न्यायालयाने आज दिला.


    ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाची सुप्रीम कोर्टात महत्त्वाची याचिका; सील केलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी


    व्यासजी का तहखाना म्हणजे काय?

    ज्ञानवापीच्या संकुलात एकूण चार ‘तहखाने’ (तळघरे) आहेत. त्यापैकी एक आजही येथे राहणाऱ्या व्यास कुटुंबाच्या ताब्यात आहे. शैलेंद्र कुमार पाठक व्यास यांनी मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीच्या विरोधात खटला दाखल करून जिल्हा दंडाधिकारी यांना तळघराचा रिसीव्हर म्हणून नियुक्त करण्याची विनंती केली. याचिकेनुसार, पुजारी सोमनाथ व्यास 1993 पर्यंत तेथे पूजा करीत असत.

    परंतु 1993 मध्ये तत्कालीन मुलायमसिंह सरकारच्या आदेशानुसार वाराणसीतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यास तळघर बंद केले. त्यामुळे व्यास कुटुंबीयांनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध केस दाखल केली. शैलेंद्र कुमार पाठक व्यास हे सोमनाथ व्यास यांचा नातू असल्याने त्यांना तळघरात प्रवेश करून पूजा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, असे याचिकेत नमूद केले. व्यास तळघर बंद केल्याने मशीद समितीचे लोक तळघराला भेट देत असतात आणि ते ताब्यात घेऊ शकतात, असा आरोप त्यांनी याचिकेत केला पण एआयएमसीचे वकील अखलाक अहमद यांनी हा आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळून लावला. पण वाराणसी कोर्टाने व्यास तळघर उघडून तिथे पूजा करण्याचा अधिकार दिला.

    शैलेंद्र कुमार व्यास यांच्याबरोबरच अन्य हिंदू याचिकाकर्त्यांनी ज्ञानवापीशी संबंधित इतर अनेक खटले देखील दाखल करून पूजेचे अधिकार मागितले आहेत.

    भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) सादर केलेल्या अहवालात ज्ञानवापीशी संबंधित 32 पुरावे सादर करून तेथे भव्य मंदिर असल्याचे नमूद केले आहे. वाराणसीमध्ये ज्ञानवापी मशीद बांधण्यापूर्वी ते एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात होते. विद्यमान संरचनांच्या सखोल अभ्यास केल्यानंतर तिथे मंदिराच्या अस्तित्वाचे 32 पुरावे मिळाले. त्या सर्वांचा तपशीलवार उल्लेख भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने आपल्या अहवालात केला आहे.

    What is ‘Vyasji ka Tehkhana’, the Gyanvapi complex part where Varanasi court allowed pooja?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य