• Download App
    West Bengal Governor Jagdeep Dhankhar will go on a week long visit to North Bengal from tomorrow

    पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाची घडामोड; राज्यपाल उद्यापासून आठवडाभर उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

    वृत्तसंस्था

    कोलकाता – राजधानी नवी दिल्लीत केंद्रीय वरिष्ठ स्तरावर व्यापक विचारविनिमय करून आल्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड कोलकात्यात परतले. पण ते लगेच उद्यापासून कोलकाता सोडून उत्तर बंगालच्या आठवडाभराच्या दौऱ्यावर निघणार आहे. West Bengal Governor Jagdeep Dhankhar will go on a week long visit to North Bengal from tomorrow

    पश्चिम बंगालच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. राज्यात निवडणूकी दरम्यान झालेला हिंसाचार आणि निवडणूक निकालानंतर झालेला हिंसाचार अभूतपूर्व ठरला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाराकडे ढुंकूनही बघितलेले नाही. उलट हा राजकीय हिंसाचार भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप त्या सातत्याने करीत आल्या आहेत. राज्यात निवडणूक निकालानंतर ४४ हिंदूंची हत्या झाल्याचा आकडा भाजपने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात अधिकृतपणे नोंदविण्यात आला आहे.

    स्वतः राज्यपालांनी देखील निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालच्या काही संवेदनशील जिल्ह्यांचा दौरा केला होता. पण तो दोन – तीन दिवसांचा दौरा होता. त्यानंतर राज्यपालांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसेच लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. अमित शहा यांच्याशी त्यांची सलग दोन दिवस प्रत्यक्ष भेटून चर्चा झाली आहे.

    या व्यापक विचार विनिमयानंतर राज्यपाल जगदीप धनकड काल कोलकात्यात परतले. आज सायंकाळी त्यांच्या उत्तर बंगालच्या आठवडाभराच्या दौऱ्याची घोषणा राजभवनातून करण्यात आली.

    West Bengal Governor Jagdeep Dhankhar will go on a week long visit to North Bengal from tomorrow

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे