विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता: पश्चिम बंगालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणात फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. पेगाससच्या नावाखाली देशातील सर्व नेते आणि न्यायाधीशांसह सर्वांनाच नजरकैद करण्यात आलेलं आहे.West Bengal government inquiry commission in Pegasus espionage case, committee of former Supreme Court judge Madan Lokur, Jyotirmoy Bhattacharya
याची केंद्राकडून दखल घेतली जाईल आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून याची चौकशीचा निर्णय सरकार घेईल अशी अपेक्षा होती. पण केंद्रानं तसं काहीच केलं नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.कोलकाता हायकोटार्चे माजी न्यायाधीश जोतिर्मय भट्टाचार्य आणि न्यायाधीश मदन भीमराव लोकुर यांच्या नेतृत्वाखाली पेगासस प्रकरणाची चौकशी केली जाईल
आणि नेमकं कोण व कशापद्धतीनं हॅकिंग केलं जात आहे याचा तपास लावला जाईल, असं ममतांकडून सांगण्यात आलं आहे.ममता बॅनर्जी यांनी पेगासस प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारित एक समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
माज्या आवाहनानंतरही केंद्र सरकारनं याबाबत कोणतंही पाऊल उचललं नाही. त्यामुळे आज चौकशी आयोगाचा निर्णय घ्यावा लागत आहे. आमचे फोन आज टॅप होत आहेत. हे एका रेकॉर्डरसारखं आहे. विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना याची कल्पना आहे की फोन टॅपिंग सुरू आहे, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
West Bengal government inquiry commission in Pegasus espionage case, committee of former Supreme Court judge Madan Lokur, Jyotirmoy Bhattacharya
महत्त्वाच्या बातम्या
- सीमावाद चिघळला : आसाम – मिझोराम बॉर्डरवरील संघर्षात 6 जवान शहीद, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची PMOला हस्तक्षेप करण्याची मागणी
- कुरापतखोर चीनसमोर भारतीय सैन्य दलाने उभे केले तोडीस तोड आव्हान; राफेलपासून विविध क्षमतेच्या मिसाईलची सीमेवर तैनाती
- तेलंगणच्या या मंदिराचा यूनेस्कोने जागतिक वारसा स्थळांत केला समावेश, पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून दिल्या शुभेच्छा
- औरंगाबादेत शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची भाजपच्या गोविंद केंद्रेंना जबर मारहाण, मंत्री भुमरेंच्या कार्यालयात घडला प्रकार