• Download App
    Wayanad Amit Shah अमित शाह राज्यसभेत म्हणाले,आम्ही दिला होता

    Wayanad Amit Shah : वायनाडमधील विध्वंसावर अमित शाह राज्यसभेत म्हणाले, ‘आम्ही दिला होता इशारा’

    Wayanad Amit Shah

    चेतावणी देऊनही केरळ सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य दाखवले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या विनाशात शंभराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक लोक बेघर झाले असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit Shah) यांनी वायनाडमधील भूस्खलनाबाबत राज्यसभेत भाषण केले आहे.



     

    अमित शाह म्हणाले, केंद्र सरकारने केरळ सरकारला भूस्खलनाबाबत पूर्वसूचना दिली आहे. चेतावणी देऊनही केरळ सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य दाखवले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले. या घटनेबाबत इशारे देऊनही केरळ सरकारने लोकांना तेथून हटवले नाही. केरळ सरकारने केंद्राच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले.

    केरळमधील वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. या आपत्तीत आतापर्यंत 168 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत आणि अनेक अजूनही अडकून पडले आहेत. भूस्खलनामुळे घरांचे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक झाडे उन्मळून पडली असून नद्यांना पूर आला आहे. बेपत्ता लोकांचा शोध आणि सुटका करण्यासाठी सर्व शक्य साधनांसह ऑपरेशन सुरू आहे.

    Wayanad Amit Shah said in the Rajya Sabha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार

    India Wins : भारताने सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकला; इंग्लंडचा 100 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशीच्या 175 धावा