• Download App
    carpooling मोदी सरकारचे तीन मंत्री एकाच कारमधून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना!!

    Carpool togather : मोदी सरकारचे तीन मंत्री एकाच कारमधून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलची महागाई या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला आज तीन केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिसाद दिला. हे तीन केंद्रीय मंत्री आज कार पुलिंग करून एकाच कारमधून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पोहोचले.

    केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, जलसंपत्ती मंत्री सी. आर. पाटील आणि आणि मंत्री जी. किशन रेड्डी या तिघांनी एकाच कारमधून प्रवास करत कर्तव्य भवन म्हणजे नवीन केंद्रीय मंत्रालय गाठले.

    – शिवराज सिंह चौहानांचे निवेदन

    जागतिक युद्ध परिस्थितीमुळे जगाबरोबरच भारतीय अर्थव्यवस्था देखील अडचणीत आली आहे. इंधन टंचाई निर्माण झाली आहे. इंधनाचे भाव सुद्धा वाढत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या जनतेला बचतीचे आवाहन केले. या आवाहनाला आम्ही सुद्धा प्रतिसाद देऊन इंधन बचत करण्यासाठी एकाच कारने मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात आहोत. माझ्याबरोबर मंत्रिमंडळातले सहकारी सी. आर. पाटील आणि जी. किशन रेड्डी हे सुद्धा आहेत, असे शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांना सांगितले.

    – इंधन बचतीचे मोदींचे पालन

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून स्वतः त्याचे पालन करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या ताफ्यातल्या अनावश्यक गाड्या कमी केल्या. ते फक्त दोन किंवा तीन सुरक्षेच्या गाड्या घेऊन प्रवास करू लागले. त्या पाठोपाठ आज तीन केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा मोदींचे अनुकरण केले. ते कार पुलिंग करून मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहोचले.

    Union Minister Shivraj Singh Chouhan says, “Patil, Kishan, and I are going carpooling

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Khalistani : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यापूर्वी लिहिले खलिस्तानी नारे; दहशतवाद्याने ट्रेनमधील व्हिडिओ जारी केला; खालडांचा उल्लेख

    West Bengal : बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये बोट उलटली, 15 भारतीयांचा मृत्यू:32 भारतीय प्रवासी होते, यातील बहुतांश पर्यटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील होते