भाजपाशी लढण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरल्याचेही म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील अंतर कमी होण्याऐवजी वाढत आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापासून परावृत्त होत नाहीत. आता, टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल (रविवार) काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. Trinamool Congress president Mamata Banerjee criticizes Rahul Gandhi and Congress
ममता म्हणाल्या की, ”काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्याचा मुद्दा बनवून संसदेच्या कामकाजात भाजप व्यत्यय आणत आहे आणि ज्वलंत मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी त्यांना ‘हीरो’ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहिले तर नरेंद्र मोदींना कोणीही लक्ष्य करू शकत नाही.”
देशात नवीन शैक्षणिक धोरण लवकरच लागू होणार – गृहमंत्री अमित शहा
ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांना फोनवरून संबोधित करताना आरोप केला की, काँग्रेस पक्ष भाजपशी लढण्यात अपयशी ठरला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपसोबतची त्यांची युती संपुष्टात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांची भाजपासोबत मूक संमती आहे, जी बरेच काही दर्शवते.
तृणमूल काँग्रेसचे मुर्शिदाबाद जिल्हा प्रमुख आणि खासदार अबू ताहिर यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली की, “भारतीय जनता पक्ष हे आपले हितसंबंध पूर्ण करण्यासाठी असे करत आहे जेणेकरून इतर विरोधी पक्ष सामान्य लोकांशी संबंधित प्रश्न उपस्थित करू शकणार नाहीत. त्यांना राहुल गांधींना विरोधी गटाचा ‘हीरो’ बनवायचा आहे.
Trinamool Congress president Mamata Banerjee criticizes Rahul Gandhi and Congress
महत्वाच्या बातम्या
- राहुलजींचा टीआरपी घसरलाय का??; सावरकर समझा क्या…, राहुल गांधींचा फोटो शेअर करत काँग्रेसने डिवचले!!
- सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात
- महाविकास आघाडी टिकवण्यासाठी छगन भुजबळांची क्लुप्ती; म्हणाले, मला शरदराव ठाकरे आवडतात!!
- मशिदींची मुजोरी संपवा!!; राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर